शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुनंदमधून पाणी सोडण्याचे आदेश

By admin | Updated: January 23, 2016 22:31 IST

दिलासा : कळवण, देवळा, सटाणा, मालेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

कळवण : अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्पातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा आदेश शनिवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला दिला असून, कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव तालुक्यांचा काहीअंशी पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.महालपाटणे, देवपूरपाडा, लोहोणेर, ठेंगोडा, निंबोळा, धांद्री, ब्राह्मणगाव, लखमापूर, टेहेरे आदि गावांसाठी २५० दशलक्ष घनफूट व सुळे डाव्या कालव्याद्वारे काकाणे, खेडगाव, दरेभणगी, रवळजी, दह्याणे दिगर, भैताणे दिगर, नाळीद, देसराणे, धार्डे दिगर, पिळकोस, मोकभणगी, खडकी, भादवण, विसापूर, जयदर या गावांकरिता ५० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचनासाठी आवर्तन देणे शक्य असल्याचा अहवाल यांना सादर केला. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी शनिवारी पुनंद प्रकल्पातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला दिले. रविवारी (दि. २४) रोजी सदर पाणी सोडण्यात येणार आहे. सुळे डाव्या कालव्यातूनही १०० दशलक्षघनफूट पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.ओझरखेड व पुणेगाव कालव्यातून, चणकापूर उजवा कालवा व गिरणा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याबाबत तसेच चणकापूर उजव्या कालव्यातून भेंडी पाझर तलाव भरावा व अर्जुनसागर (पुनंद)मधून सुळे डाव्या कालव्याला पाणी सोडून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक संचालक केदा अहेर व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुशवाह यांची भेट घेऊन पाणी मागणीचे ठराव देऊन निवेदन दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाला पाणी सोडण्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. याबाबत गिरणा नदी खोरे प्रकल्प विभागाने अहवाल सादर करून ४०० दशलक्ष घनफूट पाणी बिगर सिंचन आवर्तनासाठी देणे शक्य असल्याने पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. आमदार राहुल अहेर, केदा अहेर व नितीन पवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (वार्ताहर)