शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनांमध्ये परिवर्तन आवश्यक

By admin | Updated: December 21, 2015 00:22 IST

वाहरू सोनवणे : लोकलढा सांस्कृतिक चळवळ संमेलनप्रसंगी प्रतिपादन

नाशिक : देशातील जाती-धर्मामध्ये स्वतंत्र अस्तित्वाची लढाई सुरू आहे़ समाजमनावर ठसा उमटविण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या साहित्य संमेलनांमध्ये समाजाचा इतिहास, परंपरा व संस्कृती समाजासमोर ठेवली जाते़त्यामुळे या साहित्य संमेलनांना परंपरावादी स्वरूप प्राप्त होत असून, ते बदलून परिवर्तनवादी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे यांनी केले़लोकलढा सांस्कृतिक चळवळीतर्फे पंचवटीतील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सभागृहात आयोजित करण्यात आलेले पहिले दलित, आदिवासी, भटके, ओबीसी संयुक्त साहित्य संमेलन रविवारी (दि़२०) पार पडले. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संमेलनाध्यक्ष सोनवणे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ हिंदी साहित्य संमेलने होत असत मात्र कालपरत्वे विविध समाज, जाती व भाषिकांचीही संमेलने सुरू झाली. माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी असा सूर या साहित्य संमेलनामधून व्यक्त होतो़ दलित, आदिवासी वा भटके आहोत यापेक्षा आपण सर्व मानव आहोत ही भावना प्रत्येकामध्ये रुजावी असा या संमेलनापाठीमागचा उद्देश असतो़ संघर्ष व सहकार्य ही मानवी जीवनपद्धती आजही आदिवासींमध्ये असल्याने ते आम्हीच मूळ असल्याचे सांगतात़ मात्र काळानुसार त्यांची जीवन व कार्यपद्धती यामध्येही बदल झाले आहेत़ आदिवासी स्त्रियांचा विचार केला तर त्यांच्यावर आजही अनेक बंधने पुरुषप्रधान संस्कृतीने घातलेली आहेत़ विलासी व भोगवादी वृत्ती, संपत्तीचा हव्यास यामुळे प्रेमावर आधारित आदिवासी व्यवस्थेचा ऱ्हास झाला़स्त्रियांना गुलाम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागणूक देण्यातच आदिवासींचा विकास व हित आहे़ यासाठी दलित साहित्य अत्यंत उपयोगी असते तरी त्यात परिवर्तन गरजेचे, असे सोनवणे यांनी सांगितले़ यावेळी व्यासपीठावर बार्टीचे महासंचालक डॉ. डी. आर. परिहार, मंत्रालयातील अपर सचिव चंदनशिवे, नगरसेवक दामोदर मानकर, विक्र ीकर सह.आयुक्त कैलास चतूर, प्रा. अनिल सिरसाठ उपस्थित होते़ दुसऱ्या सत्रात आजचा सांस्कृतिक दहशतवाद आणि दलित, आदिवासी, भटके, कष्टकऱ्यांच्या एकजुटीसमोरील आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत कुमार शिराळकर होते. प्रा. राजेंद्र ढवळे, प्रा. डी. ए. दळवी यांनी परिसंवादात सहभाग घेतला. यानंतर तिसऱ्या सत्रात पार पडलेल्या कविसंमेलनात जिल्हातील निमंत्रित व नवोदित कवींनी सहभाग घेतला होता़ (प्रतिनिधी)