शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे नाशिकरोडवरून रद्द; प्रवाशांचा प्रवास खोळंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 5:26 PM

नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत.

ठळक मुद्देपंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली.मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली

नाशिक : मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने कसाºयापासून पुढे रेल्वेरू ळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे सोमवारी रात्रीपासूनच मध्यरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत हळुहळु रेल्वे वाहतूक ‘रूळा’वर येईल, असे प्रशासनाने सांगितले.दररोज नाशिकरोड रेल्वेस्थानकातून छत्रपती शिवाजी टर्मिनलला जाणा-या पंचवटी, राज्यराणी, गोदावरी एक्सप्रेसदेखील मंगळवारी रद्द केल्या गेल्या. तसेच नंदीग्राम, देवगीरी, शालिमार या एक्सप्रेससुध्दा नाशिकवरून पुढे जाऊ शकल्या नाहीत. सोमवारी रात्रीपासून नाशिकमार्गे मुंबईत केवळ कृषीनगर एक्सप्रेस पोहचू शकली. तसेच जनता व कृषीनगर एक्सप्रेस मुंबईवरून पुन्हा नाशिकपर्यंत सुरळीत आली. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे सकाळी नाशिकरोड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मुंबईला जाणाºया चाकरमान्यांचे प्रमाण सुटीमुळे नव्हते. दुस-या राज्यातून आलेल्या प्रवाशांचा मात्र नाशिकपासून मुंबईचा पुढील प्रवास खोळंबला. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत रेल्वेस्थानकार प्रवाशांची गर्दी झाली होती. रेल्वेगाड्यांच्या चौकशीचा भडीमार केंद्रावर दिसून आला. यावेळी चौकशी अधिकारी आणि प्रवाशांमध्ये खटकेही उडाले. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने मुंबई नाशिक ते भुसावळपर्यंत रेल्वेची कोंडी झाली. बहुतांश रेल्वेगाड्या साईडट्रॅकला करण्यात आल्या होत्या. काही रेल्वेगाड्या स्थानकाबाहेर उभ्या केल्या गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. 

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेRainपाऊसMumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार