शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसोहळ्यांवरील सरसकट बंदीला व्यावसायिकांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:16 IST

सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी न आणता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ते सुरू ठेवण्याची मागणी लग्नसोहळ्यांसंबंधी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता संसर्ग : नियम पाळण्याची दिली ग्वाही

सायखेडा : लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. कोरोनामुळे या सोहळ्यांच्या आनंदावर विरजण पडले. अनेकजणांचे रोजगार हिरावून घेतले. आता कुठे पुन्हा एकदा घडी बसत असताना लग्नसोहळ्यांवर निर्बंध आणले जात आहेत. लग्नसोहळ्यांवर सरसकट बंदी न आणता कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत ते सुरू ठेवण्याची मागणी लग्नसोहळ्यांसंबंधी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केली आहे.लग्न सोहळा हा जीवनातील महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्कारात माणूस कोणतीही तडजोड करीत नाही. आयुष्यात लग्न एकदाच होते, त्यामुळे ते धुमधडाक्यात व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.अलीकडे लग्न हे घरासमोर न करता लॉन्स किंवा मंगल कार्यालयात पार पाडले जातात. त्याठिकाणी सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळतात. लॉन्स, वाद्य, भोजन सुविधा, मिरवणुकीसाठी आवश्यक असणारा घोडा, मंत्रघोष करणारा पुजारी, हार गुच्छ, छायाचित्रकार, आर्केस्ट्रा हे सर्व एकाच छताखाली मिळत असल्यामुळे मंगल कार्यालय अथवा लॉन्सला प्राधान्य दिले जाऊ लागले आहे.एका लग्नावर जवळपास दहा व्यवसाय अवलंबून असतात. शिवाय लॉन्स-कार्यालय मालकाला विविध प्रकारचे सरकारी कर भरावे लागतात. ग्रामपंचायत लॉन्स चालू आहे किंवा बंद हे न पहाता वार्षिक व्यावसायिक कराची आकारणी करते. आता पुन्हा कोरोना संकट आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा गर्दी टाळण्यासाठी लग्न अवघ्या पन्नास माणसांच्या उपस्थितीत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.शासन आदेशानुसार सामाजिक अंतर आणि आणि मास्क लावून नियमांचे पालन करीत लग्न सोहळे सुरू ठेवावेत अशी मागणी व्यावसायिकांकडून होऊ लागली आहे.एका लॉन्सवर किमान ५० बेरोजगार तरुण आणि २० व्यावसायिक अवलंबून असतात. त्यांचे कुटुंब यावर अवलंबून असते. कोरोना जरी वाढत असला तरी सामाजिक अंतर आणि इतर नियमांचे पालन करणाऱ्या लॉन्सला शासनाने परवानगी द्यावी. छोट्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ येणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यावर अवलंबून असणारे जवळपास ४० व्यवसाय बंद पडतील.- शांताराम शिंदे, लॉन्सचालक

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या