शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

नांदूरमधमेश्वर येथील अभयारण्याची ठरणार सीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 10:56 PM

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाचे पाऊल : नव्याने सीमांकनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची सीमा अद्याप निश्चित करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ज्या भागात अभयारण्य क्षेत्र अस्तित्वात नाही, तो भागदेखील अभयारण्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला होता. यामुळे सातत्याने स्थानिक रहिवासी व वन-वन्यजीव विभागात संभ्रम निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाने पाऊल उचलले असून, नव्याने सीमांकन करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. याबाबतचा आराखडा व प्रस्ताव राज्य वन्यजीव महामंडळाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्णातील निफाड तालुक्यामध्ये गोदावरी-कादवा नदीच्या संगमावार नांदूरमधमेश्वर बंधारा इंग्रजकाळात बांधला गेला. या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरला पाणथळ जागा विकसित झाली. पाणथळ जागेतील नैसर्गिक जैवविविधतेने हा परिसर समृद्ध झाला.नांदूरमधमेश्वर अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा तयार झाला असून, सीमांकनाचा मुख्य मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. यामुळे अभयारण्याची सीमा निश्चित होईल, जेणेकरून संरक्षण व संवर्धनासाठी निर्माण होणाºया अडचणींवर मात करणे वन्यजीव विभागाला शक्य होणार आहे. सीमांकन निश्चित झाल्यानंतर नैसर्गिक अधिवास विकसित करून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे.स्थानिक गावकºयांमधील संभ्रम दूर होऊन लोकसहभागातून अभयारण्याच्या विकासासाठी येणारे अडथळे दूर करता येईल, असा विश्वासही उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी व्यक्त केला आहे.सीमांकनाचा तोटा स्थानिक नागरिकांसह अभयारण्याला संवर्धनाच्या बाबतीतही आहे. भविष्यात या अभयारण्याच्या संरक्षणासाठी सीमानिश्चिती करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने वन्यजीव विभागाने आराखडा तयार केला असून, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितीत असलेल्या राज्य वन्यजीव मंडळाकडे सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.