शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

बारावी परीक्षेच्या पर्यायाचा तिढा; विद्यार्थ्यांपुढे समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:14 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीचे वेळापत्रक जाहीर करून २३ एप्रिल ते २९ मेदरम्यान परीक्षा ...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने बारावीचे वेळापत्रक जाहीर करून २३ एप्रिल ते २९ मेदरम्यान परीक्षा घेण्याचे निश्चित केले होते. बोर्डाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक आणि हॉलतिकीट ३ एप्रिलपासून उपलब्ध दिलेले आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेेतल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुढील शैक्षणिक वर्षासाठी बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची असतेे, त्यावर त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे भवितव्य अवलंबून असते. अशावेळी त्यांचे मूल्यमापन होणे अपेक्षित आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्याचा पर्याय समेार आलेला आहे. याबरोबरच त्याच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये डिस्टन्स नियमांचे पालन करून परीक्षा घेणे शक्य असल्याने मुलांना परीक्षा दिल्याचेही समाधान मिळू शकणार असल्याने परीक्षेचा पर्यायच उत्तम पर्याय असल्याचे बहुतांश शिक्षण तज्ज्ञांनी मत मांडले आहे. दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारावर गुणदान करण्याचा पर्यायदेखील काही मान्यवरांनी मांडला आहे. ऑनलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेनुसार परीक्षा घेण्याच्या पर्यायांचा विचार करावा असेही मत व्यक्त करण्यात आले आहे.

--इन्फो--

एकूण विद्यार्थी

७५,३४३

मुली

३६,५१३

मुले

३८,८३०

--विद्यार्थी संभ्रमात--

परीक्षा घेण्याबाबत अनेक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. वेळापत्रक पाहिले तर महिनाभर परीक्षेचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बदल करून विद्यार्थी पालकांना परीक्षेचा कालावधी निवडण्याची संधी दिली पाहिजे. दोन पेपर्समध्ये गॅप न ठेवता सलग परीक्षा घेतली तर पुढील महिन्यात परीक्षा घेणे शक्य होऊ शकते. इतर चर्चा करण्यापेक्षा प्रसंगावर मात करून परीक्षा घेणे कसे सुलभ होऊ शकते, याचा विचार करायला हवा. आता विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यांना दिलासा मिळावा.

-- संकेत राजभोज, विद्यार्थी

परीक्षा घेतली पाहिजे असे आमचे मत आहे. कारण त्यावरच पुढील शैक्षणिक करिअर अवलंबून आहे. आता केवळ मधला मार्ग काढला जाईल; मात्र पुढे त्याच निकालावर संधी किती मिळू शकते, हाही मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण अनेक संस्था त्यांच्या पातळीवर निकष लावत असते. परीक्षा न घेता मूल्यमापनावर निकाल दिला तर पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे परीक्षा घेतली पाहिजे.

- आकाश भोसले, विद्यार्थी

शासन, शिक्षण विभाग तसेच न्यायालय अशा पातळीवर सध्या बारावीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे निर्णय होण्यापेक्षा गुंतागुंतच अधिक होण्याची शक्यता आहे. कारण आता जरी काहीही निर्णय घेतला तरी पुन्हा न्यायालय आणि पुन्हा पडताळणी, समिती असे चक्र सुरूच राहील. ऑनलाईन परीक्षा घेऊन लागलीच निकाल देण्याचीदेखील पद्धत आहे. त्यामुळे अशा पर्ययाचा विचार करावा तरच मार्ग निघू शकेल.

-- विप्लव सायखेडकर विद्यार्थी