शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य

By admin | Updated: May 5, 2015 01:37 IST

दमा आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य

नाशिक : काही वर्षांपूर्वी असाध्य असणारा दमा (अस्थमा) आजार आता अत्याधुनिक उपचारांमुळे सुसह्य ठरू लागला आहे. अधिक काळपर्यंत प्रभावी ठरू शकणारी औषधे गेल्या वर्षभरात बाजारात दाखल झाली आहेत. तथापि, सततच्या वाढणाऱ्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत मात्र वाढ होत असल्याचे चित्र आहे. भल्याभल्यांची गाळण उडवणारा दमा हा आजार नियंत्रणात आणणे, हे पूर्वी अत्यंत जिकिरीचे काम होते. श्वास घेण्यास त्रास होणे, बोलताना धाप लागणे ही दम्याची लक्षणे. याचे पर्यावसान दम्याचा अटॅक येण्यापर्यंत होऊ शकते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी अ‍ॅलर्जी असणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणे, सतत औषधे घेत राहणे, हाच उपाय होता. दम्यासाठी औषधे उपलब्ध होती; मात्र ती वारंवार घ्यावी लागत होती. गेल्या काही वर्षांत मात्र दम्यावर नियंत्रण ठेवू शकणारी अत्याधुनिक औषधे बाजारात उपलब्ध झाली आहेत. या औषधांमुळे रुग्णांना मोठा दिलासा लाभतो आहे.
‘स्प्रे’चा प्रभाव २४ तास दम्याच्या रुग्णांसाठी पूर्वी उपलब्ध असलेले स्प्रे किंवा पंप हे दर ४ किंवा ६ तासांनी पुन:पुन्हा घ्यावे लागत असत. त्यामुळे घराबाहेर पडताना, कार्यालयीन कामाच्या ठिकाणीही ते खिशात बाळगावे लागत असत. आता मात्र या स्प्रेच्या प्रभावाचा कालावधी १२ ते २४ तासांपर्यंत वाढला आहे. याशिवाय त्यांचा आकारही लहान झाला असून, त्यांच्यात आता महिनाभराचे औषध मावते. (प्रतिनिधी)