शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी सात कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:06 IST

जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या यांत्रिकीकरणासाठी देण्यात येणाºया अनुदानापोटी सन २०१९-२० या वर्षात सहा कोटी ८९ लाख ९७ हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यात जिल्ह्यातील २०७ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले असून, त्यासाठी दोन कोटी ५१ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च केला आहे.अल्पभूधारक शेतकºयांना शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, ट्रेलर, मळणी यंत्र, रिपर, पेरणी यंत्र, मिनी राइस मिल यांसह विविध शेती औजारांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण अभियान योजनांतर्गत अनुदान देण्यात येते. ट्रॅक्टरसाठी शेतकºयाला १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. सन २०१९-२० या वर्षात ३१ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील २०७ शेतकºयांना ट्रॅक्टरसाठी अनुदान देण्यात आले. त्यात अनुसूचित जातीच्या २७, अनुसूचित जमातीच्या ७३ आणि सर्वसाधारण गटातील १०७ शेतकºयांचा समावेश आहे. शेती औजारांसाठी अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकºयांना ५० टक्के, सर्वसाधारण गटासाठी ४० टक्केअनुदान दिले जाते.कृषी यांत्रिकीकरण उपअभियान घटक ३ योजनेअंतर्गत जिल्ह्णासाठी पाच कोटी ५८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी आतापर्यंत ४ कोटी ६४ लाख ४ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असून, त्यातून ६०५ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. सर्वाधिक संख्या मालेगाव उपविभागाची असून, येथे १६९ शेतकºयांना लाभ मिळाला आहे.राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ५९ लाख ५७ हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यातील ५० लाख ९३ हजारांचा निधी खर्च झाला असून, एकूण ९६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतही मालेगाव विभाग पुढे असून, ३६ शेतकºयांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात २६ शेतकºयांना १२ लाख ८ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.राष्टÑीय कृषी विकास योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी एकूण २ कोटी ८७ लाख ३९ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी एक कोटी ७५ हजारांचा निधी खर्च झाला आहे. या योजनेचे १ कोटी १२ लाख ३९ हजार रुपये अद्याप शिल्लक आहेत. या योजनेचा ३४६ शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. कळवण उपविभागात ४८ लाख ३७ हजारांचा निधी खर्च झाला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा