जिल्ह्यात दिवसभरात ५७ कोरोनाबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 01:43 AM2021-04-21T01:43:00+5:302021-04-21T01:44:20+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल  ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे जिल्ह्यात वर्षभरात कोरोना बळींची संख्या तीन हजार पार गेली आहे. 

57 corona sacrifices in a day | जिल्ह्यात दिवसभरात ५७ कोरोनाबळी

जिल्ह्यात दिवसभरात ५७ कोरोनाबळी

Next
ठळक मुद्देधक्कादायक : कोराेना बळींचा आकडा तीन हजार पार; ५ हजार नवीन बाधित

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल  ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे जिल्ह्यात वर्षभरात कोरोना बळींची संख्या तीन हजार पार गेली आहे. 
गेल्या वर्षी पेक्षा यंदा कोराेनाची लाट मोठी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून, नाशिकमध्ये संसर्ग वेगाने पसरतोच आहे, परंतु त्याचबरोबर मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. एप्रिल महिन्यात तर एका दिवसात तीसपेक्षा कमी मृत्यू झाल्याची अपवादानेच नोंद आहे. जिल्ह्यात मंगळवारी (दि.२०) एकाच दिवसात ५७ बळींची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे बाधितांची संख्या शहरात जास्त असली तरी ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. नाशिक शहरात नऊ, तर मालेगाव महापालिका क्षेत्रात तीन रुग्ण दगावले, तर उर्वरित ग्रामीण भागात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा बाह्य दोन जणांचादेखील मृत्यू झाला आहे. मृत्यूची वाढलेली आकडेवारी नाशिककरांच्या चिंतेत भर घालणारी ठरली आहे. 
३ हजार १६८ रुग्ण बरे
दिवसभरात ५ हजार ५ इतके नवे रुग्ण आढळले असून, यात नाशिक शहरातील २ हजार ७७७, तर ग्रामीण भागातील २ हजार १६७ बाधितांचा समावेश आहे. मालेगाव येथील २१ आणि जिल्हाबाह्य ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३ हजार १६८ रुग्ण बरे झाल्याचीही नोंद झाली आहे.

Web Title: 57 corona sacrifices in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.