शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

कोळदा ते प्रकाशा रस्ता रुंदीकरण झाले जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कच्चा रस्ता असल्याने पावसाचे पाणी साचून जागोजागी रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पाण्याच्या मोठमोठ्या डबक्यांमधून वाहन काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शनिवारी सुमारे अर्धा तास एक रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. तापी नदीवरील पुलाला पडलेले खड्डेही अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून आहे. नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी राहिले आहे. त्यातच कोरीट फाटा ते समशेरपूर कारखाना या दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जागोजागी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात याठिकाणी वाहनधारकांचे मोठे हाल होतात. त्यातून छोटे-मोठे अपघाती घडत आहेत. कोरीट फाट्यापासून सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंतचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या तीन दिवसापासून अखंडितपणे पाऊस सुरू असल्याने व रस्ता कच्चा असल्याने रस्त्याला जागोजागी तलावाचे स्वरुप आले आहे. या खड्यात किती पाणी आहे याचा अंदाज येत नसल्याने डबक्याच्या मध्यभागीच वाहन अडकून पडत आहेत. एक वाहन अडकले तर वाहतूक ठप्प होऊन वाहनांची मोठी रांगच लागते. त्यात अडकलेल्या वाहनधारकाची प्रचंड फजिती होते.गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास अजून किती दिवस सहन करायचा व त्याला जबाबदार कोण? या रस्त्याच्या कामामुळे अजून किती जणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त प्रश्न त्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. शहादा व धडगाव या तालुक्यातून रुग्णांना अ‍ॅम्बुलन्सने या मार्गावरून न्यावे लागते आणि नेमके या ढबक्यांमुळे वाहने अडकून पडत आहेत. एखद्या अत्यवस्थ रुग्णास वेळीच उपचार मिळाला नाही तर त्याला प्राण गमवावे लागू शकतात. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त असताना प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या रस्त्याचीही प्रचंड दूरवस्था झाली आहे. या पुलावर मोठा खड्डा पडला असून त्यात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. याठिकाणी तर दररोज अपघात होत आहेत. तापी पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. या खड्ड्यांमुळे पुलालादेखील हादरा बसत आहे. वाहनेही नादुरुस्त होत आहेत व अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या रस्त्याची वेळीच डागडूजी केली नाही तर प्रकाशा येथील ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.