शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

कोळदा ते प्रकाशा रस्ता रुंदीकरण झाले जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : : प्रकाशा ते नंदुरबार मार्गावर कोरीट फाटा ते समशेरपूर कारखान्यामध्ये रस्त्याचे काम अपूर्ण आहे. कच्चा रस्ता असल्याने पावसाचे पाणी साचून जागोजागी रस्त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पाण्याच्या मोठमोठ्या डबक्यांमधून वाहन काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून शनिवारी सुमारे अर्धा तास एक रुग्णवाहिकाही अडकून पडली होती. तापी नदीवरील पुलाला पडलेले खड्डेही अपघाताला आमंत्रण देत आहेत. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्रस्त वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की, कोळदा ते सेंधवा या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून आहे. नंदुरबार ते प्रकाशा दरम्यान काही ठिकाणी काम झाले आहे तर काही ठिकाणी राहिले आहे. त्यातच कोरीट फाटा ते समशेरपूर कारखाना या दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जागोजागी रस्त्याचे काम अपूर्ण आहे. पावसाळ्यात याठिकाणी वाहनधारकांचे मोठे हाल होतात. त्यातून छोटे-मोठे अपघाती घडत आहेत. कोरीट फाट्यापासून सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंतचे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या तीन दिवसापासून अखंडितपणे पाऊस सुरू असल्याने व रस्ता कच्चा असल्याने रस्त्याला जागोजागी तलावाचे स्वरुप आले आहे. या खड्यात किती पाणी आहे याचा अंदाज येत नसल्याने डबक्याच्या मध्यभागीच वाहन अडकून पडत आहेत. एक वाहन अडकले तर वाहतूक ठप्प होऊन वाहनांची मोठी रांगच लागते. त्यात अडकलेल्या वाहनधारकाची प्रचंड फजिती होते.गेल्या तीन ते चार वर्षापासून या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास अजून किती दिवस सहन करायचा व त्याला जबाबदार कोण? या रस्त्याच्या कामामुळे अजून किती जणांना जीव गमवावा लागेल, असा संतप्त प्रश्न त्रस्त वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. कारण सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. शहादा व धडगाव या तालुक्यातून रुग्णांना अ‍ॅम्बुलन्सने या मार्गावरून न्यावे लागते आणि नेमके या ढबक्यांमुळे वाहने अडकून पडत आहेत. एखद्या अत्यवस्थ रुग्णास वेळीच उपचार मिळाला नाही तर त्याला प्राण गमवावे लागू शकतात. त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनीच लक्ष घालून या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त असताना प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या रस्त्याचीही प्रचंड दूरवस्था झाली आहे. या पुलावर मोठा खड्डा पडला असून त्यात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे. याठिकाणी तर दररोज अपघात होत आहेत. तापी पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदाराचे दुर्लक्ष आहे. या खड्ड्यांमुळे पुलालादेखील हादरा बसत आहे. वाहनेही नादुरुस्त होत आहेत व अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या रस्त्याची वेळीच डागडूजी केली नाही तर प्रकाशा येथील ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.