शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शहरातील कालिका मंदिर परिसरातील नुकसान ग्रस्तांपैकी अजूनही बहुसंख्य कुटुंबांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आले असून, त्यांनाही तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.याप्रकरणी या नुकसानग्रस्त कुटुंबांनी तहसीलदार पंकज लोखंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जोरदार पजर्न्यवृष्टी होवून खर्डी नदीला मोठा पूर आला होता. यामुळे पुराचे पाणी नदी काठालगत वसलेल्या कालिका माता परिसरातील अनेक घरांमध्ये शिरून घरांचे नुकसान झाले होते. याशिवाय संसारोपयोगी सामान व धान्यदेखील वाहून गेले होते. प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे केल असले तरी हे पंचनामे करतांना मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. कारण पथकातील कर्मचा:यांनी एकाच ठिकाणी बसून पंचनामे केले आहे. त्यामुळे या पथकाने ज्यांची नावे सांगितले त्यांचीच पंचनामे केले आहेत. परंतु जी नुकसानग्रस्तांची यादी आपणाकडे दिली होती. ती कुटुंबे खरोखर नदी किणारी राहत असून, त्यांनाच वगळण्यात आले आहे. साहजिकच बहुसंख्य कुटुंबे शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. आपल्या स्तरावर तातडीने चौकशी करून राहिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी दुजाभावातून नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्यातआल्याचा आरोपही महिलांनी केला होता.याप्रसंगी अंबालाल साठे, युवा शक्तीचे विनोद माळी व नुकसानग्रस्त उपस्थित होते.

4शहातील खर्डी नदीला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निधीतून आतापावेतो 550 कुटुंबांना साधाण 17 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. अजूनही मोठय़ा प्रमाणात क्षतीग्रस्त कुटुंबे राहिली आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. हा निधी आल्यावर लगेच वाटप करण्यात येणार असलल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान येथील प्रशासनाने पाठविलेल्या निधीच्या प्रस्तावावर जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून निधी उपलब्ध करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.