शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसात हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील १० हजारपैकी ३ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप केली आहे़ पहिल्या टप्प्याचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई झाली होती़ परंतू जिल्ह्यात सात हजार शेतकरी भरपाईपासून वंचित असून या आठवड्यात त्यांना मदत मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यात ७८, नवापुर १ हजार ५९३, शहादा २ हजार ६८, तळोदा ८, अक्कलकुव ३ हजार ९६५ तर धडगाव तालुक्यात ३ हजार १७३ शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले होते़ एकूण १० हजार ८८५ शेतकºयांचे नुकसान झाल्यानंतर त्यासाठी तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचे अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती़ यातील पहिल्या टप्प्यातील १ कोटी ३३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर वाटप करण्यात आले होते़ दुसºया टप्प्यात ७ हजार ७३३ शेतकºयांना २ कोटी रुपयांची भरपाई प्रस्तावित असून ती नेमकी कधी मिळणार, याबाब प्रशासनाकडेही ठोस अशी माहिती नाही़ परंतू ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे़प्रशासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत ३ हजार १५२ बाधित शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी १३ लाख ५६ हजार रुपये वर्ग केले होते़ यात नंदुरबार तालुक्यातील ७८ शेतकºयांना ४ लाख ४१ हजार, नवापुर १ हजार ५५०, शहादा ५०९ तर धडगाव तालुक्यातील २९३ शेतकºयांना प्रत्येकी २७ लाख २१ हजार, तळोदा तालुक्यातील २२ शेतकºयांना ३३ हजार तसेच अक्कलकुवा तालुक्याच्या ७११ शेतकºयांना २७ लाख १९ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे़ उर्वरित ७ हजार ७३३ शेतकºयांना भरपाई मिळणार कधी याकडे लक्ष लागून होते़ या शेतकºयांसाठी २ कोटी रुपयांच्या भरपाई अनुदानाची मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे़ याबाबत प्रशासनातील अधिकाºयांनी गेल्या आठवड्यात नाशिक येथील बैठकीत रकमेची मागणी केली होती़ यातून चालू आठवड्यात ही रक्कम प्रशासनाकडे जमा होण्याची शक्यता आहे़