शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

चोरट्यांच्या मोर्चा आता पांढऱ्या सोन्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 12:04 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि वारंवार होणारा वातावरणातील बदल यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. उत्पन्न निम्म्यावर आले आहे. असे असतांना आता शेतकऱ्यांना नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. वेचनीवर आलेला कापूस शेतातूनच रात्रीच्या वेळी चोरून नेण्याचा प्रकार नंदुरबार व शहादा तालुक्यात वाढला आहे. सहा ते सात घटनांमध्ये दीड ते दोन लाखांचा कापूस आतापर्यंत चोरीस गेला आहे.यंदा कापूस आणि कांद्याला बºयापैकी भाव मिळत आहे. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा या दोन्ही पिकांची उत्पादकता निम्म्यावर घटली आहे. त्याचा परिणाम भाववाढीत झाला आहे. ज्या शेतकºयांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना बºयापैकी भाव मिळत आहे. असे असतांना आता चोरट्यांच्या धुमाकुळमुळे शेतकºयांच्या हाती येणारे उत्पन्न देखील हिरावले जात असल्याचे चित्र सध्या नंदुरबार व शहादा तालुक्यात दिसून येत आहे.खरीपाचे सर्वाधीक क्षेत्रयंदाही खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्र हे कापसाचे होते. एक लाखापेक्षा अधीक हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली होती. परंतु अती पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे कापूस पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला, सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले. यामुळे उत्पादकता निम्म्यावर घसरली. वेचणीची वेळ आल्यावर अवकाळी पाऊस झाल्याने त्यामुळेही कापूस खराब झाला.भाव चांगला असल्यानेसध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला ५३०० ते ५५०० रुपये प्रतीक्विंटल भाव मिळत आहे. यापुढे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस चोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी किमान चार ते पाच क्विंटल कापूस चोरून नेला तरी ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान शेतकºयांना सोसावे लागत आहे. त्यामुळे पांढºया सोन्याच्या संरक्षणासाठी आता शेतकºयांना रात्रीचा दिवस करण्याची वेळ आली आहे. आठवडाभरात जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. काही शेतकरी भितीपोटी पोलिसात तक्रार देत नाहीत. रात्रीच्या वेळी कापूस वेचणी करून ती रातोरात लंपास करण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर पाच ते सहा संख्येने चोरटे रात्री कापूस वेचनी करीत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.दहशतीचे वातावरणपाच ते सहाच्या संख्येने चोरटे कापूस वेचणीसाठी येत असल्याचा अंदाजाने एकटा शेतकरी किंवा रखवालदार त्यांचा सामना करू शकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यामुळे पोलिसांनी शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे काही शेतकरी आता स्वत: गटागटाने शेत शिवारात गस्त घालण्यासाठी तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे.भाव समाधानकारकसध्या कापसाला भाव समाधानकारक मिळत आहे. खेडा खरेदीत शेतकºयांना घरबसल्या ४८०० ते ५१०० रुपये भाव मिळत आहे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर प्रतवारीनुसार थेट ५५०० रुपये भाव मिळू लागला आहे. ही बाब पहाता कापूस यंदा भाव खात असला तरी चोरीच्या घटनांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.