शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

शेतात पाणी साठले अन् नयनी अश्रू दाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:43 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अशी स्थिती आहे़ शेतातील पाणी काढण्यास जागा नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून पिके हातून गेल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरवत रब्बी हंगामाच्या तयारीची वाटचाल सुरू केली आहे़जिल्ह्यात संथ सुरूवात करणाºया पावसाने जुलै ते आॅगस्ट दरम्यान मुसळधार हजेरी लावली आहे़ परिणामी सुस्थितीत असलेली पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली आहेत़ आॅगस्ट महिन्यात २७ हजार शेतकरी आधीच बाधित झाले होते़ यात पुन्हा सप्टेंबर महिन्यात सलग १० दिवस कोसळलेल्या पावसात उरली सुरली पिकेही हातची गेली असून सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे अद्यापही पूर्णपणे सुरू झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ गेल्या वर्षीची अतीवृष्टी, मार्चपासून थैमान घालणारा कोरोना आणि आता पुन्हा संततधारेने झालेले नुकसान यामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे़ यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे़ ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात नुकसानीचा आढावा घेत पाहणी केली असता, चार दिवस उलटूनही शेतात पाणी साठून असल्याने पिकांवर मर आल्याचे दिसून आले़ धान्यपिके, कापूस, फळ पिके आणि तेलबिया पिके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत़ यातून शेतातील चांगली पिकेही रोगराईच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे़

 जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या आहेत़ यात यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७४ हजार ८६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १७ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ९८१ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे़