शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

शेतात पाणी साठले अन् नयनी अश्रू दाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात गेल्या १० दिवसात कोसळलेल्या पावसामुळे शेतीपिके हातची गेली आहेत़ यामुळे शेतात पाणी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अशी स्थिती आहे़ शेतातील पाणी काढण्यास जागा नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र असून पिके हातून गेल्याने अनेकांनी शेतात नांगर फिरवत रब्बी हंगामाच्या तयारीची वाटचाल सुरू केली आहे़जिल्ह्यात संथ सुरूवात करणाºया पावसाने जुलै ते आॅगस्ट दरम्यान मुसळधार हजेरी लावली आहे़ परिणामी सुस्थितीत असलेली पिके नुकसानीच्या गर्तेत सापडली आहेत़ आॅगस्ट महिन्यात २७ हजार शेतकरी आधीच बाधित झाले होते़ यात पुन्हा सप्टेंबर महिन्यात सलग १० दिवस कोसळलेल्या पावसात उरली सुरली पिकेही हातची गेली असून सर्व तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे अद्यापही पूर्णपणे सुरू झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे़ गेल्या वर्षीची अतीवृष्टी, मार्चपासून थैमान घालणारा कोरोना आणि आता पुन्हा संततधारेने झालेले नुकसान यामुळे शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे़ यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढणार आहे़ ‘लोकमत’ने जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात नुकसानीचा आढावा घेत पाहणी केली असता, चार दिवस उलटूनही शेतात पाणी साठून असल्याने पिकांवर मर आल्याचे दिसून आले़ धान्यपिके, कापूस, फळ पिके आणि तेलबिया पिके पाण्यात असल्याने सडू लागली आहेत़ यातून शेतातील चांगली पिकेही रोगराईच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र दिसून येत आहे़

 जिल्ह्यात यंदा २ लाख ९५ हजार २१९ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या झाल्या आहेत़ यात यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७४ हजार ८६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १७ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ९८१ हेक्टरवर पिकांची पेरणी झाली आहे़