शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

पुरात वाहून गेलेल्या बंधाºयाची दुरुस्ती नाही

By admin | Updated: March 15, 2017 00:33 IST

गोमाईवरील केटीवेअर : १० वर्षांपासून दामळदा परिसरात पाणीटंचाई


शहादा : तालुक्यातील दामळदा परिसरातील गोमाई व खापरी नदीवरील केटीवेअर बंधारे २००६ च्या महापुरात वाहून गेल्यानंतर अद्यापही त्या बंधाºयांची दुरुस्ती अथवा नवीन बंधारे न बांधण्यात आल्याने परिसरात तीव्र पाणीटंचाईचे सावट आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे लक्ष न घातल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दामळदा परिसरात गोमाई, उमराई व खापरी अशा तीन नद्या असून त्यावर केटीवेअर बंधारे बांधण्यात आले होते. मात्र २००६ मध्ये अतिवृष्टीने या नद्यांना आलेल्या मोठ्या पुरांमध्ये बंधारे वाहून गेले. त्यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन दुरुस्तीची मागणी व नवीन बंधारे बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी व परिसरातील शेतकºयांनी केली आहे. परंतु त्यासंदर्भात कुठलीही दखल न घेण्यात आल्याने आज या परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. शेतीतील विहिरी व कूपनलिकेतील पाण्याची पातळी खोल गेल्याने असंख्य विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे अर्थकारणही बिघडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यासंदर्भात दामळदा परिसरातील शेतकरी व शेतमजुरांनी लोकप्रतिनिधींकडे निवेदन दिले आहे. त्यात नवीन बंधारे त्वरित बांधावेत व वाहून गेलेले बंधारे त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
गोमाई नदीवर तापीवरील बॅरेजेसप्रमाणे बॅरेजेस बांधल्यास या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटू शकेल. त्यामुळे यासंदर्भातही शासनाने विचार करून तसे सर्वेक्षण करून बंधारे मंजूर करण्याची मागणी शेतकºयांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)