शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा यावर्षीही जूनमध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व ...

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व अटीनुसार चालू झाले होते. मात्र केवळ अडीच ते तीन महिने विद्यार्थी शाळेत गेले. जानेवारी महिन्यातही पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाने नियम आखून देत सुरू केले. मात्र मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने कहर माजविल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे सरसकट सगळे वर्ग शासनाला बंद करावे लागले. नंतर एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे यावर्षीची दहावीची परीक्षाही शासनाला रद्द करावी लागली. बारावी परीक्षेचेही भिजत घोंगडे पडले असून अद्यापही काही निर्णय झालेला नाही.

जे विद्यार्थी यावर्षी पहिलीला होते, त्यांनी शाळेचे तोंड न बघताच त्यांना दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. इतर वर्गाचेही तसेच आहे. वर्षभर शाळेत न जाताही विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. शाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनचा पर्यायी मार्ग असला तरी ग्रामीण भागामध्ये अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या मुलांना ऑनलाईन क्लासही जॉईन करता आले नाही. परिणामी वर्षभर मुले घरीच असल्यामुळे त्यांच्या मनातील शिक्षणाविषयी मानसिकतेवर तर परिणाम झालाच आहे. परंतु पूर्ण वर्षच वाया गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. तर आता दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले. आता तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असून शासनाने लसीकरणाचा टप्पा वाढविला नाही, तर सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून वंचितच राहावे लागेल. म्हणून लसीकरणाचा टप्पा वाढविला तर बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊन निदान दिवाळीनंतर तरी शाळा सुरू होतील, अशा प्रतिक्रिया पालकांमधून ऐकायला भेटत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून लहान मुलांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. मागील वर्षापासून शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. शासनाने लसीकरणाचा वेग वाढविल्यास निदान दिवाळीनंतर तरी आमची मुले शाळेत जाऊ लागतील. म्हणून यापुढे तरी मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

- दिनेश मटू माळी, पालक जयनगर. ता. शहादा.