शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम कोर्टाचा निर्णय ओबीसींवर अन्यायकारकच- राम रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरक्षणानुसार सर्व समाज घटकांना नेतृत्वाची, जनतेच्या सेवेची संधी मिळावी यात कुणाचे दुमत नाही. जिल्हा परिषद, पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आरक्षणानुसार सर्व समाज घटकांना नेतृत्वाची, जनतेच्या सेवेची संधी मिळावी यात कुणाचे दुमत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठीच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा नंदुरबार जिल्ह्यापुरता तरी ओबीसींवर अन्यायकारक आहे. याबाबत न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते राम चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा परिणाम जिल्ह्यात काय होईल?

घटनेने दिलेल्या आरक्षणाप्रमाणे सर्व समाजांना राजकारणात नेतृत्वाची संधी आहे. त्या प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात देखील २७ टक्के आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ११ जागा राखीव होत्या. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तर सहाही जिल्हा परिषदांना लागू होणार आहे. वास्तविक इतर पाच जिल्ह्याची समाज, जातनिहाय परिस्थिती वेगळी आहे व नंदुरबारची वेगळी आहे. त्यामुळे नंदुरबारचा वेगळा विचार होणे गरजेचे होते. त्यावरच ओबीसींचा आक्षेप राहणार आहे.

या सर्व जागा आता ओपन होतील तेव्हा ओबीसींवर अन्याय होणार नाही का?

तोच आमचा आक्षेपाचा मूळ मुद्दा आहे. इतर जिल्ह्यात ओबीसींसाठी काही जागा राखीव राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात मात्र सर्वच ११ जागा या ओपन होणार आहेत. त्यातही सहा जागा या महिलांसाठी राखीव होतील. ओपन जागेवर ओपनचा उमेदवारासह ओबीसी व इतर कुठलाही प्रवर्गाचा उमेदवार उभा राहणार आहे. त्यामुळे तो देखील अन्यायच म्हणावा लागेल. अर्थात घटनेच्या अनुषंगाने ते ठीक आहे. परंतु जिल्ह्यातील ओबीसींनी कुठे जावे हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे न्यायालयाने फेरविचार करणे आवश्यक ठरणार आहे.

न्यायालयात जाणार...

या निकालाच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण नको असे न्यायालयाचे म्हणने असले तरी जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. सर्व समाज घटकांना कायद्याच्या तरतुदीनुसारच न्याय मिळावा. यासाठी विधीतज्ज्ञांचे मत घेऊन याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राजकीय स्थितीवर काय परिणाम...

या निर्णयाचा जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर परिणाम होईलच. त्यासाठीच या निकालाला स्टे मिळावा यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रयत्नशील आहेत.

जि.प.चे कामकाज...

न्यायालयाने निकाल दिला त्याच दिवसापासून अर्थात ४ मार्चपासून संबंधित सर्व ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे जि.प.च्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहेच.