शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पोषण पुनर्वसन व बाल उपचार केंद्र तातडीने सुरू करा- जि.प. सीईओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

नंदुरबार : पावसाळ्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र ...

नंदुरबार : पावसाळ्यात कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्र अद्ययावत ठेवून त्यात बालकांना दाखल करून घेण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले आहेत. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त देताच प्रशासन स्तरावर हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्ह्यातील पोषण पुनर्वसन केंद्र बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जिल्हा परिषदेेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यात मार्च २०२१च्या मासिक अहवालानुसार ९०८ सॅम तर आठ हजार ५२१ मॅम बालके आहेत. या बालकांवर ग्राम बालविकास केंद्र तसेच बाल उपचार केंद्र/पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये तातडीने उपचार करण्यासाठी सूचीत करण्यात आले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी कुटुंब स्थलांतराहून परत आलेली आहेत. या कुटुंबांमधील सहा वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषित बालके तसेच आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दरवर्षी जिल्ह्यात मान्सूनपूर्व विशेष आरोग्य तपासणी मोहिमेअंती प्राप्त अहवालामध्येसुद्धा कुपोषित आणि आजारी बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात सॅम, मॅम आणि आरोग्य समस्या असणाऱ्या बालकांवर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा मान्सून कालावधीत जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व पोषण पुनर्वसन केंद्र व बाल उपचार केंद्रामधील सेवा पूर्णवेळ संपूर्ण मनुष्यबळ, आहार व औषध साठ्यासह अद्ययावत ठेवावे, असेही या पत्रात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्पष्ट केले आहे.