शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खडकी रस्त्यावर जीप अपघातात सहा मजूर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या ...

हे सर्व मजूर खडकी, ता. धडगाव येथून रोजगारासाठी गुजरात राज्यातील साखर कारखान्यात जाणार होते. शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या जीपमध्ये ३० प्रवासी बसले. प्रवास सुरू झाल्यानंतर तोरणमाळ-खडकी या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर जीप आली असता तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर जीप सुमारे ४०० ते ५०० फूट खोल दरीत कोसळली. यात सहा प्रवासी जागीच मृत झाले असून अनेक गंभीर झाले आहेत. विशेष म्हणजे प्रवाशांनी खचाखच भरलेली ही जीप दरीत कोसळण्यापूर्वी अनेकांनी गाडीबाहेर उड्या मारल्याने त्यांचा जीव वाचला.

तोरणमाळ येथील खडकी पॉइंटपासून सुमारे २०० मीटर अंंतरावरील घाटरस्त्यात तीव्र चढाव आहे. एका वळणावर वाहनचालकाचा ताबा सुटल्याने ही जीप खोल दरीत प्रचंड वेगाने पडली. या अपघातात जीपगाडीचे पूर्ण नुकसान झाले असून चारही बाजूने गाडी पूर्णपणे उलटल्याने फुटली आहे. जीपचे इंजिन, दरवाजे व इतर स्पेअर पार्ट अस्ताव्यस्तपणे आजूबाजूला पडले होते. अपघाताची भीषणता एवढी भयावह होती की, संपूर्ण दरीतून जखमी प्रवाशांच्या किंकाळ्या, आरडाओरड व रडारडीमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

खडकी गावातून सकाळी सात वाजता निघाल्यानंतर खडकी पॉइंटजवळ अवघ्या काही मिनिटात हे सर्व प्रवासी पोहोचणार होते. खडकी पॉइंट येथून तोरणमाळपर्यंत सपाटीचा रस्ता आहे. मात्र त्यापूर्वीच जीप घाटात कोसळली व काळाने या सर्वांवर घाला घातला. अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी खडकी पॉइंट ते तोरणमाळ असे सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी पळत जाऊन तोरणमाळ गावात पोहोचल्यानंतर तेथील नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर तोरणमाळचे माजी सरपंच पहाडसिंग नाईक, जयसिंग चौधरी, जीवन रावताळे, करमसिंग चौधरी, सायसिंग रावताळे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

अतिशय खोल दरी असल्याने येथील जखमी व मृत प्रवाशांना दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाला मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागली. कुठलीही साधन सुविधा नसताना तोरणमाळच्या ग्रामस्थांनी वनविभाग, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळेल ते साधन साहित्याचा वापर करून जखमींना दरीतून बाहेर काढले व मृत प्रवाशांचे पार्थिव बाहेर काढले.

या अपघातात चिमा धीसा नाईक (३५), बाईजीबाई रेलसिंग नाईक (३८), कुचलीबाई रेलसिंग नाईक (१८), रिमाबाई रायसिंग नाईक (९), सेकडीबाई सायसिंग नाईक (४५), रिंगाटीबाई चिमल्या नाईक (२५) हे सहा मजूर प्रवासी मृत झाले असून त्यात पाच महिलांचा समावेश आहे.

तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल जखमींमध्ये जामा रायसिंग चौधरी (१९), मेलसिंग रायसिंग नाईक (१९), सुनील रायसिंग नाईक (१७), रुमाल्या बागल्या नाईक (६५), शर्मिला चिमा नाईक (३वर्षे), रायमल खेड्या नाईक (५०), चोमा धिसा नाईक (४५), कालसिंग वांग्या नाईक (७०), आमश्या गोरख्या नाईक (३०), कैलास रायसिंग नाईक (२५), विजय रायसिंग नाईक (१५) यांचा समावेश आहे.

तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेल्या गंभीर जखमींमध्ये सुनीता सायसिंग नाईक (१५), गणेश रेवज्या रावताळे (२८), रायमल वेल्या नाईक (५०), गोरख्या नाईक (५वर्षे), बायसिंग नाईक (५वर्षे), वांग्या नाईक (४०), गोहऱ्या बाया नाईक (५५) या गंभीर जखमींना डोक्याला, छातीला व मणक्यांंना गंभीर मार लागला असून काहींचे हात व पायांची हाडे मोडल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी त्वरित पाठविण्यात आले आहे.