शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा तीन लाख वृक्ष लागवडीचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : मेवासी वनविभाग तळोदाकडून यंदा आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी तयारी करण्यात आली असून साधारण सव्वा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : मेवासी वनविभाग तळोदाकडून यंदा आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी तयारी करण्यात आली असून साधारण सव्वा तीन लाख विविध प्रजातीचे वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी वनविभागाला आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे.तळोदा मेवासी वनविभागात तळोदा व अक्कलकुवा या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तळोद्यासह खापर, अक्कलकुवा, मोलगी, काठी व वडफळी असे सहा रेंज आहेत. या वनविभागाचे साधारण ६० हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष लागवडीसाठी मेवासी वनविभागाने यंदाही तयारी केली असून त्यासाठी मजुरांकडून खड्डेही खोदून तयार ठेवले आहेत. साधारण तीन लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन असल्याचे वनविभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. यात सिसम, लिंब, साग, खैर, बांबू, आवळा, अंजन, चिंच, महुफूल अशा प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे. त्यासाठी स्वत:च्याच रोपवाटिकाही तयार केल्या आहेत. सर्वात जास्त लागवड खैर वृक्षाची करण्यात येणार आहे. एक लाख ८७ हजार खैर जातीची लागवड करण्यात येणार आहे. त्याखालोखाल बांबूची लागवड करण्यात येणार आहे. बांबूचीही एक लाखापेक्षा अधिक रोपे लावणार आहे. असे असले तरी ही रोपे किती प्रमाणात जगतात हाही एक संशोधनाचाच भाग आहे. कारण वनविभाग एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर ते जगले की नाही शिवाय त्यांच्या निगाबाबतही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तेथे केवळ वृक्षांऐवजी खड्ड्यांचेच अस्तित्व दिसून येते. वनविभाग ८० टक्के रोपे जगल्याचा दावा करत असते. परंतु प्रत्यक्षात त्याचे सर्वेक्षण होणेदेखील गरजेचे आहे. वास्तविक वृक्ष लागवड वाढीसाठी शासनाचा सतत प्रयत्न असतो. त्यासाठी प्रचंड निधीही खर्च केला जातो. मात्र लावलेल्या रोपांचे संगोपन आणि निगा राखण्यासाठीही संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी राज्य शासनाने सात कोटी वृक्ष लागवडीचा निर्धार केला होता. यासाठी शासनाच्या सर्वच यंत्रणांना वृक्षारोपणाचे विशिष्ट टार्गेट दिले होते. मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली होती. सर्वच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षही लावण्यात आले होते. मात्र त्यातील मोजकेच रोपे जगल्याचे चित्र आहे. निगाअभावी शासनाचा पैसा वाया गेल्याचे म्हटले जात आहे.