शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष आदेशानुसार निवडणुका लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषद निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पक्ष आदेशानुसार जिल्हा परिषद निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. त्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगून विधानसभा निवडणुकीनंतर आता पक्षाने पुन्हा उभारी घेतली आहे. कुणाचीही तमा न बाळगता पक्ष वाढविण्यासाठी सर्वांनी मेहनत करावी असे आवाहन देखील पक्ष निरिक्षक नाना महाले यांनी केले.विधासनभा निवडणुकीनंतर राष्टÑवादी काँग्रेसचा पहिलाच जिल्हास्तरीय मेळावा नंदुरबारात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी आणि काही इच्छुकांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. पक्ष निरिक्षक नाना महाले यांच्यासह माजी आमदार शरद गावीत, माजी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमलता शितोळे यांच्यासह पदाधिकारी व इच्छूक उमेदवार उपस्थित होते. नाना महाले यांनी सांगितले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पक्ष प्रमुख जो निर्णय देतील त्याप्रमाणे लढविली जाईल. आघाडी करायची किंवा स्वतंत्र लढायचे याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. असे असले तरी जास्तीत जास्त जागांवर पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.पक्ष तळागाळापर्यंत पोहचलेला आहे. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व कुणीही संपवू शकत नाही. जि.प.निवडणुकीत पक्षाची ताकद दिसलेच असेही त्यांनी सांगितले.माजी आमदार शरद गावीत यांनी प्रास्ताविकात निवडणुकीची माहिती दिली. काही कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी काही इच्छुकांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या. लवकरच यादी जाहीर केली जाणार असल्याचे महाले यांनी सांगितले. बैठकीला माजी पदाधिकारी अनिल भामरे, सागर तांबोळी, राजेंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.