शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीतील पाण्याच्या नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : देशात हरितक्रांती आली उत्पादनात वाढ झाली. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाण्याची पातळी खालावत चालली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : देशात हरितक्रांती आली उत्पादनात वाढ झाली. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे पाण्याची पातळी खालावत चालली आहे. पाण्याचा अतिउपसा होत असल्याने भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नियोजन करणे गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात पाण्याचा किती व कसा वापर करायचा याचे नियोजन महिलांकडून शिकण्यासारखे आहे. पाण्याचा वापर नियोजनबद्ध केल्यास भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष भासणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर विभागाचे क्षेत्रीय डॉ.पी.के. जैन यांनी केले.शहादा येथील मीरा प्रताप लॉनमध्ये केंद्र शासनाच्या जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागाचे केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्यक्षेत्र नागपूर यांच्यातर्फे स्थानिक स्तरावर भूजल प्रबंधन आणि बजेटिंग या विषयावर तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच, पंचायत राज संस्था व शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जैन बोलत होते. या वेळी गटविकास अधिकारी सी.टी. गोस्वामी, कार्यकारी अभियंता पी.टी. बडगुजर, कल्याण जाटव, हैदरअली नुरानी उपस्थित होते.डॉ.जैन पुढे म्हणाले की, देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीत पडतो. त्याचवेळी देशातील इतर भागात सर्वात कमी पाऊस होतो. आकडेवारी सांगते की, देशातील १३ टक्के भागात नद्यांना पूर येतात. त्याचवेळी देशातील १८ टक्के भागात सरासरी पर्जन्यमान कमी असते. राज्यातही अशीच परिस्थिती आहे. आज पाण्याची समस्या ‘आ’वासून उभी आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा अतिवापर टाळावा. पाण्याचे योग्य नियोजन करावे. गाव पातळीवर पाण्याचे बजेट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून आदर्श गाव हिवरे बाजार, वर्धा जिल्ह्यातील तामसवाडी, उमरी मेघे या गावांचे उदाहरण देऊन ग्रामसभेचे महत्त्व पटवून दिले.गटविकास अधिकारी गोसावी म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबर पाण्याचे बजेट न झाल्याने भविष्यात वरुणराजाची कृपा झालीच नाही तर भूगर्भातील पाणी जास्त काळ टिकू शकत नाही. यासाठी वॉटर बजेटींग करणे गरजेचे आहे. राज्यात इतर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले. सुदैवाने आपल्याकडे फारशी गंभीर परिस्थिती नाही, ती वेळ येऊ नये यासाठी ग्रामसेवक व ग्रामस्थांनी संयुक्तरित्या नियोजन केले पाहिजे. कळंबू येथील ग्रामस्थ व ग्रामविकास अधिकारी आर.आर. बोरसे यांनी म्हणाले की, तापी नदीवर बॅरेजेस झाले पण शेतीला पाणी मिळाले नाही. उपसा योजना कार्यान्वित झाल्या नाही म्हणून सिंचनासाठी पाणी मिळत नाही. देशात समान नागरी कायदा झाला तर लोकसंख्येवर नियंत्रण करता येईल. लोकसंख्या नियंत्रण झाले तर पाण्याचे नियोजनही करता येईल. वृक्ष लागवड मोहीम राबवली जाते त्यासोबत वृक्षसंवर्धनासाठी काही यंत्रणा राबवली गेली पाहिजे, याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगिलते. या वेळीभूजल माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. सूत्रसंचालन जुनेद अहमद यांनी तर आभार संदीप वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कॅथेरिन लुईस, निर्मलकुमार नंदा, एस.बी. पराडकर आदींनी परिश्रम घेतले.