शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा रद्दबाबत पालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन ...

जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला आणि मार्चपर्यंत कोरोनाने भयंकर रूप धारण केल्याने २२ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन लागले होते. सुदैवाने तोपर्यंत दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आटोपल्या होत्या. फक्त दहावीचा एक पेपर रद्द झाला होता. पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात पाठविण्यात आले होते. यंदादेखील कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून मागील वर्षापेक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने शालेय शिक्षणमंत्र्यांनी पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा होणार नसल्याचे तर नववी व अकरावीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाने पालक व शैक्षणिक वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेली वर्षभर पहिली ते आठवीच्या शाळाच सुरू झाल्या नाहीत. नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या असल्या तरी १०० टक्के विद्यार्थी उपस्थित नसल्याने अनेक विद्यार्थी प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिले ऑनलाईन शिक्षणही १०० टक्के यशस्वी न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. अशात परीक्षा झाल्या तरी विद्यार्थी परीक्षेला सामोरे कसे जाणार हा प्रश्न आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदादेखील नववी आणि अकरावीच्या परीक्षा होण्याची शक्यता कमीच आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन झाल्यास तीदेखील मोठी रिस्क ठरू शकते. एकंदरीतच यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्षदेखील ढकलपासच होणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या आरोग्याबाबतही पालकांना चिंता आहे. शाळा सुरू झाल्या तर आरोग्याचा प्रश्न आणि शाळा बंद राहिल्या तर शिक्षणाचा प्रश्न अशा कात्रीत पालक सापडले आहेत.