शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन सुविधा अन् वीज कनेक्शनचा प्रमुख मुद्दा; प्रकलपग्रस्तांच्या पंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या ११ वासहतींपैकी एकट्या तळोदा तालुक्यात सात वसाहती आहेत. या वसाहती सन १९९५ साली स्थापन ...

सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या ११ वासहतींपैकी एकट्या तळोदा तालुक्यात सात वसाहती आहेत. या वसाहती सन १९९५ साली स्थापन झाल्या आहेत. सुरुवातीस पाच वर्षे नर्मदा विकास विभागाकडे असलेल्या या ग्रामपंचायती सन २०००मध्ये जिल्हा परिषदेच्या ताब्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सध्या त्यातील नर्मदानगर, सरदारनगर, रेवानगर, रोझव पुनर्वसन, अशा चार ग्रामपंचायतींचे निवडणूक कार्यक्रम सुरू आहेत. त्याचबरोबर राणीपूर, बंधारा व पाढळपूर या तीन ग्रामपंचायतींचादेखील निवडणूक सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी फारसे प्रयत्न न झाल्यामुळे तब्बल १३४ जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. साहजिकच हौशे-नवशेदेखील आपले भाग्य आजमावत आहेत. सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्पास सुरुवात केली आहे.

शेतीची कामे सुरू असल्यामुळे सर्व मजूर मतदार कामासाठी सकाळी लवकरच शेतात निघून जात असल्याने उमेदवारांची अक्षरशः दमछाक झाली आहे. मजूर सायंकळी घरी परत आल्या नंतर उमेदवारही तेव्हाच प्रचार करत असतात. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या नसल्यामुळे उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटी गाठीवरच अधिक भर दिला आहे. सर्वच ठिकाणी उमेदवारांनी मतदारांना शासनाचे घरकुल, शौचालय, संजय गांधी योजना, आदिवासी विकास विभागाच्या योजना व गावातील विकासकामे यावर जोर दिला आहे. यातून मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातही रेवनगर, सरदारनगर, नर्मदा नगर व रोझवा पुनर्वसन या प्रकल्पग्रस्तांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकासाच्या ऐवजी वेगळेच प्रचाराची मुद्दे उमेदवार यांनी बनविले आहेत. या ठिकाणी सर्वच उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या सिंचन सुविधा व वीज कनेक्शनचा मुद्दा प्रमुख बनविला आहे. या मुद्द्याभोवतीच तेथील निवडणूक रंगली आहे. कारण या चारही वसाहतींमधील शेतकरी मतदार आहेत. ते आपल्या शेतातील सिंचन सुविधांबाबत आजही उपेक्षित आहेत. वसाहती स्थापन होऊन २० ते २५ वर्षे झालीत. अजूनदेखील त्यांना आपल्या शेतात पुरेशी सिंचनाची सुविधा नाही. ज्यांनी खासगी पैशातून कृषिपंप केले आहे. त्यांना अद्याप तागायत पैसे भेटली नाहीत. उधार, उसनावरीन व सावाकराकडून पैसे घेऊन कृषिपंप बसविला आहे. शिवाय बहुसंख्य शेतकरींना वीज कनेक्शन दिलेले नाही. त्यासाठी ते सतत संबंधित अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत. अजूनही त्यांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. नेमके उमेदवारांनी हाच धागा पकडून प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला आहे. साहजिकच प्रकल्पधारकांच्या या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्यातही विद्यमान सरपंच, उपसरपंच याच्या पॅनलविरोधात माजी पदाधिकाऱ्यांनी शड्डू ठोकल्यामुळे ग्रामपंचायतींची निवडणूक अतिशय चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चारही ठिकाणी मुख्यतः काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांमध्ये सामना आहे. येथे १४ प्रभागांतून साधारण ४० जागा आहेत. तब्बल ९२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. नर्मदानगर व रेवानगर या ग्रामपंचायतीत प्रत्येकी ११ जागा, तर सरदारनगर आणि रोजवे येथे प्रत्येकी नऊ जागा आहेत.

नेत्यांच्या सभाची उत्सुकता

तळोदा तालुक्यातील या सात ग्रामपंचायतींमधील उमेदवारांनी आता पावेतो आपापल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या वैयक्तिक भेटी गाठीवर भर दिला आहे. त्यांनी प्रचाराचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण केला आहे. दुसऱ्या टप्प्याला सुरुवातदेखील केली आहे. परंतु अजूनही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांना सुरुवात केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण मतदारांना सुद्धा सभांची उत्सुकता लागली असल्याचे उमेदवार सांगतात. गावांमध्ये पायाभूत सुविधांचा प्रश्न असला तरी त्यांच्या सिंचनाच्या प्रश्नदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. शिवाय हा प्रश्न वरिष्ठ नेत्यांशिवाय सोडवला जाऊ शकत नाही. त्यामुळे हा मुद्दा मतदारांना तेच पटवून देऊ शकतात. साहजिकच नेत्यांच्या सभा गावात होणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु नेत्यांच्या सभांबाबत अजूनही कार्यकर्त्यांनी पाहिजे तसा प्रतिसाद न दिल्यामुळे उमेदवरांनी त्यांच्या भूमिकेविषयी नाराजीचा सूर व्यक्त केला आहे.