शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच ...

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यामध्ये व त्यात शहादा तालुक्यात पपई उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याच अनुषंगाने पपई व्यापारी हे शहादा शहरात वास्तव्यास आहेत. शहादा तालुक्यातून पपई खरेदीचे व्यवहार व्यापाऱ्यांच्या माध्यमातून एकतर्फी पद्धतीने ठरवले जातात. कारण त्याच व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना पपई पिकांचे रोप, औषध, रासायनिक खत घेण्याकरिता व्यापारी शेतकऱ्यांना काही अ‍ॅडव्हास स्वरूपात रक्कम देतात व पपई उत्पादनाची मनमर्जी पद्धतीने खरेदी करतात. या सर्व मनमानी कारभारावर आळा घालण्यासाठी शासनाने नियम लागू केले आहेत; पण त्या सर्व नियमांची पायमल्ली करीत पपई व्यापारी बिनधास्त शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत, तसेच अनेक व्यापारी शेतकऱ्यांना जास्ती भावाचे किंवा पैशांचे आमिष दाखवून फसवणूक करून पळूनही जातात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील काळात अनेक वेळा वारंवार शासन दरबारी निवेदन देऊन पपई व्यापाऱ्यांचे शासनमान्य कागदपत्र पूर्ण करून त्यांना परवाना दिला पाहिजे व ज्या व्यापाऱ्याकडे शासनमान्य परवाना असेल त्यालाच फक्त पपई खरेदी करण्याचे अधिकार दिले पाहिजेत. त्यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यास मदत करावी. जिल्ह्यात फळबागायतदार शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्याचे काम होत आहे. कारण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही, नियमावली नाही, कोणतीही कागदोपत्री शासन दरबारी नोंद नाही म्हणून कसे काम करायचे किंवा शेतकऱ्यांचा माल भरून पैसे न देता पळून जाणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर बाजार समितीचे दरपत्रकानुसार खरेदी करण्याचे आवाहन करूनही परस्पर दर कमी करून पपई उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापारी करीत आहेत. व्यापार कोणीही कुठेही करू शकतो, त्यावर कोणतेही बंधन नाही; परंतु आर्थिक व्यवहार हे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच झाले पाहिजेत. कारण हे परप्रांतीय व्यापारी आज मोठ्या प्रमाणात करोडो रुपयांचा व्यवहार करीत आहेत; पण शासनाच्या तिजोरीत एकही रुपया जमा न करता कर चोरी करत आहेत. फळ खरेदी करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांचे परवाने काढून त्यांची संपूर्ण माहिती द्यावी, शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाल्यास त्यांचे पैसे काढून देण्यास मदत करावी व संबंधित व्यापाऱ्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून कठोर कारवाई करून शिक्षा करावी. पपई उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमक्ष बैठक घेऊन सर्व विषयांवर चर्चा करून २५ जानेवारीपर्यंत मार्ग काढावा, अन्यथा २६ जानेवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नंदुरबार तसेच नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष नथू पाटील, कृष्णदास पाटील, वामन पाटील, रवींद्र पाटील, सचिन पाटील, गणेश पाटील, ईश्वर चौधरी, महेंद्र पाटील, रत्नदीप पाटील आदींच्या सह्या आहेत.