शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा नियमितपणे सुरु झाल्या असून नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच ...

जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळा नियमितपणे सुरु झाल्या असून नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे संपूर्ण राज्यात सर्वप्रथम शाळा सुरु करण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्यात पार पडली आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिक्षणाची मोठी हानी झाली आहे. ही हानी भरुन काढणे शिक्षण यंत्रणेतील प्रत्येक घटकाचे कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून शाळा सुरु करताना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही शिक्षकांना देण्यात आले आहेत. सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहून वर्गखोल्या व शालेय परिसर स्वच्छ करुन घ्यावात. शाळा अनुदान, लोकसहभाग व ग्रामपंचायत निधी अशा विविध मार्गांनी सॅनिटायझर व इतर अनुषंगिक साहित्य शाळेत उपलब्ध करुन घ्यावे. प्रायोगिक तत्वावर सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना शाळेमध्ये उपस्थित ठेवून नियमित अध्यपन करावे. वरील बाबी करणे सक्तीचे नसले तरी जिल्ह्यातील विशेष करुन अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नियंत्रणात असलेली कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या भागात शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शिक्षकांनी व पर्यायाने शिक्षण विभागाच्या यंत्रणेने पार पाडावे. तसेच इतर तालुक्यांनीही याबाबत पुढाकार घेऊन कार्यवाही करावी, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.