शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय वापराविषयी ग्रामीण भागात उदासीनताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

तळोदा तालुक्यात सन २०१७-१८ ते २०१९-२० पर्यंत एकूण सात हजार ८२१ शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यासाठी तब्बल नऊ कोटी ...

तळोदा तालुक्यात सन २०१७-१८ ते २०१९-२० पर्यंत एकूण सात हजार ८२१ शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यासाठी तब्बल नऊ कोटी ३८ लाख ५२हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०१९-२० या वर्षअखेरीस प्रशासनाकडून शौचालय बांधणीचे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. २०२०-२१ या वर्षात एकही शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कागदी घोडे नाचवून शौचालय बांधणीचे उद्दिष्ट प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले असले तरी शौचालयाची उपयुक्तता अत्यल्प प्रमाणात असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

हजारो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याऐवजी आजही ग्रामीण भागात नागरिक मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र दिसून येते. काही ठिकाणी बांधण्यात आलेली शौचालयाये ही वापराअभावी बंद अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी शौचालयांमध्ये सरपण, जनावरांचा चारा, कडबा, गोवऱ्या इत्यादी प्रकारचे साहित्य भरलेले आढळून आले आहे. अनेक शौचालयांचे काम हे अपूर्ण अवस्थेत असून अनेक शौचालयांच्या टाक्यांचे बांधकामच केले गेले नसल्याची स्थिती आहे. नुसते अनुदान काढण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण दाखवण्यात आले असून प्रत्यक्षात मात्र शौचालयांचे काम अपूर्ण अवस्थेतही पहायला मिळते. या शौचालयांची दूरवस्था झाली असून काहींचे दरवाजे गायब झाले आहेत तर काहींच्या भांड्याची नासधूस झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे प्रशासनाकडून जरी तालुक्यात शौचालय उभारणीच्या उद्दिष्टपूर्तीचा दावा करण्यात येत असला तरी या उद्दिष्टपूर्तीची फलश्रुती असल्याचे फोल ठरत आहे.

केंद्र सरकारच्या वतीने २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छतेबाबत सुधारित धोरण आणि पर्याप्तेच्या माध्यमातून ग्रामीण समाजाला पूर्णपणे सामावून घेण्यासाठी स्वच्छ भारत मिशन राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवून आणणे, ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्याप्तीची गती वाढवून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत स्वच्छ भारतचे स्वप्न साकार करणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह हगणदरीमुक्तीच्या कार्यक्रमातील जुन्या उणीवा दूर करुन तो प्रभावीपणे राबविणे, शाश्वत स्वच्छतेचा साधनांचा प्रसार करणा­ऱ्या पंचायतराज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जागृती व आरोग्य शिक्षण याव्दारे प्रेरित करणे, पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे ही या अभियानाची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली होती. पण तळोदा तालुक्यातील सद्यस्थिती बघता या अभियानाच्या हेतूलाच हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे. केवळ कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाने धन्यता मानली का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थीला १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. अनेक जण योजनेत बसत नसताना अनुदान मिळविण्यासाठी व स्वच्छ भारत मिशनच्या कागदोपत्री यशासाठी योजनेत बसविण्यात आले. शौचालय बांधकाम अनुदानाचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत असताना त्याला शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रम असणाऱ्या या योजनेची व उद्दिष्टांची जाणीव करून दिली जाणे आवश्यक होते. त्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे होते. मात्र तसे दिसून आले नसल्याचा अनुभव आहे. अनेकदा वरिष्ठ प्रशासनाकडून झाडाझडती झाल्यावर शौचालय बांधकाम मोहिमेला गती मिळाली. काही ठिकाणी तर गावात शौचालय बांधकामाचा ठेका देण्यात येऊन रात्रीतून शौचालय उभारली गेल्याचेही सांगण्यात येते.