शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पुलाजवळ अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:17 PM

   लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. ...

   लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पुलाजवळ जेसीबीने टेकडी फोडून अवैधरित्या गौणखनिज काढले जात आहे. हे गौणखनिज मशिनरीने काढले जात असल्याने मोठ्या प्रमाणात कंपन होतो. त्यामुळे पूल व बॅरेजला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच गौणखनिज काढल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून उत्तरेकडील भागात शेतात तापी नदीचे पाणी घुसून शेतपिकांचे नुकसान होणार आहे. महसूल विभागाने येथे होणारा अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा बंद करून संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलाच्या पायथ्याशी व बॅरेजपासून अवघ्या काही अंतरावरच अवैधरित्या जेसीबीद्वारे टेकडीचे खोदकाम करून  गौणखनिजाची बेसुमार वाहतूक सुरू आहे. वास्तविक नदीलगत, पुलालगत व बॅरेजलगत असे खोदकाम करता येत नाही, हा प्रकार नियमबाह्य असून त्यामुळे बॅरेज व पुलाला धोका निर्माण होऊ शकतो. नदीलगत ही टेकडी असल्याने उत्तरेकडील शेतांमध्ये नदीचे पाणी शिर नाही. त्यामुळे पिकांचे एकप्रकारे संरक्षण होते.  मात्र काही ठेकेदारांनी त्यांनी घेतलेल्या रस्ते व    इतर कामांसाठी परवानगी न घेता जेसीबीद्वारे थेट खोदकाम करून डंपरच्या डंपर भरून गौणखनिज उपसण्याचे उद्योग सुरू केले आहेत.   तापी नदीला पूर आला तर पाणी थेट उत्तरेकडील भागातील शेतात शिरुन शेतपिकांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होईल यात कोणतीही शंका नाही. गौणखनिज काढण्याआधी महसूल विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर संबंधित ठेकेदार कुठून गौणखनिज घेणार आहे याची नोंद केली जाते. गौणखनिजाची परवानगी देताना महसूल विभाग गौणखनिज काढल्यानंतर नुकसान होणार नाही याची पाहणी करुनच परवानगी देऊन तशा सूचनाही संबंधितांना देण्यात येतात. मात्र प्रकाशा येथे वेगळाच प्रकार सुरू आहे. याविषयी प्रकाशा येथील तलाठी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, गौणखनिजासाठी आता कोणालाही परवानगी दिलेली नाही, असे सांगितले. मग प्रकाशा येथील तापी नदीजवळ गौणखनिज का काढले जात आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. जर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मातीचा भराव करायचा असेल तर त्यांना रॉयल्टी भरावी लागते. रॉयल्टी भरली नाही तर दंडात्मक कारवाई केली जाते. मग  येथे अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात असून येथून अवैधरित्या गौणखनिजाचा उपसा करणाऱ्यांचा महसूल विभागाने शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.

चौकशीची मागणीकोळदा ते सेंधवा रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. ज्याठिकाणी काम अपूर्ण आहे अशा ठिकाणी भरावाचे काम सुरू आहे. तसेच प्रकाशा ते तोरणमाळ रस्त्याचेही  काम सुरू आहे. या रस्त्यावर मातीचा भराव करण्याचे काम सुरू आहे. या कामांसाठी ही टेकडी फोडण्याचे काम सुरू असल्याचे समजते. दोन्ही ठेकेदारांपैकी  गौणखनिजाचा उपसा कोण करीत आहे याचा संबंधित विभागाने शोध घ्यावा. की या दोन्हींपैकी अजून तिसरा कोणी आहे याचा तपास करून तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. परवानगी दिली असेल तर जवळच पूल व बॅरेजला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. तसेच टेकडीमुळे शेतपिकांचे नदीतील पाण्यापासून होणारे संरक्षण हे मुद्दे संबंधित विभागाने विचारात का घेतले नाही, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. महसूल विभागाने भविष्यातील धोके व होणारे नुकसान लक्षात घेऊन येथे होणारा गौणखनिजाचा उपसा बंद करण्याची मागणी होत आहे.