शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

किराणा मालाच्या भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, खाद्यतेलात वर्षभरात दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे जीवन संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यातच किराणा मालाचे ...

कोरोना महामारीमुळे मागील वर्षापासून सर्वसामान्य माणसाचे जीवन संचारबंदीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्यातच किराणा मालाचे भाव खूपच वाढल्याने आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून गेले आहे. मागीलवर्षी सोयाबीन तेलाचे भाव ८० ते ९० रुपये प्रती किलो असा होता. सध्या सोयाबीन तेलाचे भाव १७० रुपये प्रती किलो असा आहे. दिवसागणिक वाढणारे तेलाचे भाव व संसारोपयोगी वस्तूंचे भाव वाढतच असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमडले आहे.

सोयाबीन तेलाचे पाच लीटरच्या ड्रमसाठी ८३० ते ८५० रुपये मोजावे लागत आहेत. तर १५ लीटरच्या डब्याचा भाव अडीच हजार रुपयांच्या घरात आहे. वाढत्या तेलाच्या दरामुळे भाजीची फोडणी तेलाची द्यायची का पाण्याची द्यायची, असा संतप्त प्रश्न महिला उपस्थित करीत आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे सततची संचारबंदी, उद्योगधंदे बंद पडल्यामुळे हाताला नसलेले काम, शेतातील मजुरीचे कामही मशागतीचे दिवस असल्यामुळे बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अन्य खाद्यतेलाचे दर उच्चांकी असल्यामुळे सर्वसामान्य जनता सोयाबीन तेलाला पसंती दर्शवितात. मात्र तेच आता अधिक महाग झाल्याने अशा बेरोजगारीच्या दिवसात सर्वच वस्तूंचे भाव वाढल्याने घर खर्च भागवायचा कसा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

किराणा मालात इतर वस्तूंचे भावही वाढले

आधीच कोरोना संकटकाळामुळे अनेकांवर उपासमारीचे संकट ओढवले असताना त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीमुळे समस्येत अधिकच वाढ झाली आहे. त्यातच खाद्यतेलाच्या भावासोबत गूळ, साखर, शेंगदाणे, डाळी तसेच इतरही किराणा मालाचे भाव वाढल्याने खायचे काय? असा प्रश्न संचारबंदीच्या या काळात गरीब जनतेला पडला आहे. हाताला काम नाही त्यातच दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती सामान्य जनतेची झाली आहे. त्यामुळे शासनाने खाद्यतेल व इतर किराणा वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सद्यस्थितीत शेतातही काम नाही. संचारबंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. दिवसेंदिवस खाद्य तेलासह किराणा मालाचे भाव वाढत असून गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने खाद्यतेलाच्या दरात घट करायला हवी.

-प्रियंका किशोर खलाणे, जयनगर, ता.शहादा