शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
2
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
3
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
4
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
5
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
6
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
7
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
8
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
9
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
10
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
11
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
12
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
13
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
14
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
15
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
16
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
17
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
18
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
19
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
20
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याकडून शेळी फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील बेबीबाई शंकर भिल यांनी घराच्या ओट्यावर बांधलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : तळोदा तालुक्यातील मोड येथील बेबीबाई शंकर भिल यांनी घराच्या ओट्यावर बांधलेल्या शेळ्यावर शुक्रवारी रात्री ११ वाजता हल्ला चढवत एका शेळीला फस्त करीत दुसरीला जखमी केल्याची घटना घडली.
याबाबत असे की, बेबीबाई शंकर भिल यांनी रात्री आपल्या सहा शेळ्यांना घराच्या ओट्यावर बांधल्या होत्या. रात्री ११ वाजता शेळ्या ओरडत असल्याने त्यांना जाग आली व त्यांनी पाहिले असता बिबट्याने एका शेळीला जखमी केले तर एक फस्त करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड करीत नागरिकांना जागे केले. या वेळी ग्रामस्थ जमा होताच बिबट्याने तेथून पळ काढला.
या घटनेचे वृत्त सरपंच जयसिंग माळी यांनी वनखात्याचे अधिकारी व वनपाल आनंद पाटील यांना दिल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून ठसे घेतले असता बिबट्यानेच शेळीला फस्त केल्याचे सांगितले. गेल्या आठ दिवसांपूर्वीही विजय ठाकरे यांच्या गाईच्या बछड्याला नेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच परिसरात बिबट्याने शेळीवर हल्ला चढविल्याने या बिबट्याचा मानवी वसहातीत वाढलेला वावर पाहता त्याचा त्वरित जेरबंद करून नुकसानग्रस्तांना त्वरित नुकसान भरपाई देवून बिबट्याला जंगलात सोडण्याची मागणी पशुपालक व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. या वेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र जमदाळे यांनी शेळीवर पोस्टमार्टम केले.
आदिवासी कुटुंब शेत मजुरीसह दुय्यम व्यवसाय म्हणून गायी व शेळ्या पाळत असतात. या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असतात. परंतु जंगलातील हिंस्त्र प्राणी आता मानवी वसाहतींकडे वळू लागल्याने या कुटुंबावर उपासमारीचे वेळ येऊ शकते. त्यामुळे संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात पिंजरे लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी केली आहे. सरपंच जयसिंग माळी यांनी गेल्या आठवड्यात प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे या हिंस्त्रप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरे व कॅमेरे लावले होते. परंतु त्यात बिबट्या जेरबंद होत नसल्याने बोरद व मोड परिसरात या हिंस्त्र प्राण्यांची परिसरात दहशत वाढत असल्याने वनविभागाने रात्रीच्या वेळेस गस्त घालून त्यांना त्वरित जेरबंद करावे अपेक्षा शेतकरी व पशुपालकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.