शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या वर्षीचा पीकविमा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:27 IST

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत ...

बामखेडा : पीकविमा कंपनीने सलग दोन ते तीन वेळेस पीकविमा मंजूर केला होता. विमा हा मोठ्या प्रमाणात मंजूर होत असल्याने शेतकरीही मोठ्या आशेने पिकांचा विमा उतरवित असत. मात्र, गेल्या वेळेसचा म्हणजे सन २०२० मध्ये पिकांचे नुकसान होऊनही विमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पीकविमा कंपनीवरचा भरोसा कमी झालाय की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार ही पावसावर आहे. पाऊस पडला तर ठीक नाही तर उन्हाळाच, त्यामुळे येथील शेतकरी पीकविमा भरण्याला जास्त महत्त्व देत आहेत. परंतु गेल्या वेळेस अति पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, असे असतानाही कंपनीने विमा मंजूर केला नाही. खरीप हंगामातील पीकविम्याचा हप्ता भरण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा सुरक्षित करण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरलेला होता व अतिपावसाने पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. तरीही जिल्ह्यातील नेतेमंडळी चिडीचूप असल्याने त्याचाच परिणाम म्हणून की काय, या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

मागील वर्षी पपई, केळी, कापूस, तूरसह इतर पिकांचा पीकविमा उतरविला होता. शेवटी प्रयत्न म्हणून विमा मिळेल, अशी आशा होती. पण आता विमा परतावा मिळण्याची आशा पार मावळली असल्याने यावर्षीचा पीकविमा भरण्याची द्विधा परिस्थिती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी जसा खरीप हंगामातील पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह होता तसा यावेळेस उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीचा २०२०चा पीकविमा मिळाला नसल्यामुळे आता २०२१च्या खरीप हंगामातील विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.

- भय्या गवळे, आपले सरकार सेवा केंद्र, बामखेडा

खरीप हंगाम २०२० मध्ये तालुक्यातील वडाळी महसूल मंडळात बहुतेक शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील क्षेत्राचा पीकविमा भरला होता. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीला रक्कम भरली होती. मात्र शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

- बन्सी पटेल, शेतकरी, बामखेडा