शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अन्नातून विषबाधेमुळे एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 11:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील आठ जण अत्यवस्थ होऊन बहिण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास दुर्गम भागातील खाईच्या वाडीखाडीपाडा येथे घडली़ सकाळी प्रकृती गंभीर झालेल्या सहा जणांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले़वाडीखाडी पाडा येथे घडलेल्या या ह्रदयद्रावक घटनेत जयवंती दमण्या राऊत (१४) व विपुल दमण्या राऊत (दीड वर्ष) या दोघांचा तातडीने उपचार न मिळाल्याने मंगळवारी रात्र ते बुधवारी पहाटेदरम्यान काही तासात मृत्यू झाला़ अक्कलकुवा तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील खाईच्या वाडीखाडी पाड्यावरील दमण्या गोमा राऊत व तुकाबाई दमण्या राऊत या दाम्पत्यावर ही आपत्ती ओढावली़ मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी तुकाबाई राऊत यांनी शेतातून हरभऱ्याच्या रोपांची पाने तोडून घेत सायंकाळी कुटूंबासाठी त्याची भाजी व भाकºया तयार केल्या होत्या़ रात्री मुलगी जयवंती, कविता, दोहरी, नंदनी, मुलगा विपुल आणि गवल्या यांच्यासह पती दमण्या यांना ही भाजी खायला दिली होती़ तुकाबाई यांनीही हीच भाजी भाकरीसह खाल्ली होती़ दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा जयवंती हीला अचानक उलट्या सुरु झाल्या़ यातच जुलाब आणि उलट्या सुरु होऊन अवघ्या काही तासात तिचा मृत्यू झाला़ तिचा मृत्यू झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास भाऊ विपुला हाही विषबाधेने दगावला़ राऊत परिवाराच्या इतर सदस्यांनाही त्रास जाणावू लागल्यानंतर वाडीपाडा ग्रामस्थांनी दुपारी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणले होते़ याठिकाणीही सर्वांवर उपचार शक्य नसल्याने त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आले़ यातील चौघांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याची माहिती आहे़सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान दमण्या राऊत, तुकाबाई, नंदनी, गोवल्या, दोहरी आणि कविता या सहा जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले़ यात तुकाबाई यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांकडून देण्यात आली आहे़ सर्व सहा जणांना अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे़ मयत झालेल्या दोघांना तातडीने उपचार न मिळाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे़ १४ वर्षीय मयत मुलगी जयवंती आणि दीड वर्षांचा भाऊ विपुल या दोघांचे मृतदेह वाडीपाडा येथेच असून आई-वडील आणि भावंडांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़वाडीखाडीपाडा सातपुड्यातील अत्यंत दुर्गम भागात असून अत्यवस्थ अवस्थेतील आठही जणांना तेथील ग्रामस्थांनी रायसिंगपूर उचलून आणले होते़ महिलेसाठी थेट बांबूलन्स तर लहान मुलांना खांद्यावर टाकून ग्रामस्थ रायसिंगपूर पर्यंत आले होते़ येथून वाहनाने सर्वांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले़ हरभºयाच्या रोपावर फवारणी केल्यानंतर तो न धुताच खाल्ल्याने राऊत कुटूंबाला अपाय झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे़