शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधांची ‘एक ना धड भारभर चिंध्या’ अशी गत नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST

तीन वर्षांपूर्वी जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याचा दर्जा दिला गेला आहे. आदिवासी दुर्गम जिल्हा तसेच दरडोई उत्पन्नाबाबत, मानव निर्देशांकाबाबत, रोजगाराची उपलब्धता ...

तीन वर्षांपूर्वी जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याचा दर्जा दिला गेला आहे. आदिवासी दुर्गम जिल्हा तसेच दरडोई उत्पन्नाबाबत, मानव निर्देशांकाबाबत, रोजगाराची उपलब्धता आणि निर्मिती याबाबत राज्यात जिल्ह्याचा शेवटचा क्रमांक लागत असल्याने जिल्ह्याची त्यासाठी निवड करण्यात आली. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात निती आयोगाच्या निधीतून अर्थात आकांक्षित जिल्ह्याच्या माध्यमातून अनेक कामी झाली. अनेक योजना राबविल्या गेल्या. तिमाही अहवालात शैक्षणिक व स्वच्छता या बाबतीत जिल्ह्याने वरचा क्रमांक देखील मिळविला आहे. त्यामुळे या योजना राबवितांना त्यात सातत्य दिसून येत आहे. आता जिल्हाप्रशासनाचा भर हा आरोग्य सुविधा वाढविण्यावर असल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण आधीच आरोग्याच्या सुविधांची वाणवा आणि वर्षभरापासून सुरू असलेला कोरोनाचा कहर. कोरोनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची कमतरता दिसून आली. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी त्या अधीक सक्षम करण्यावर भर दिला आहे. अर्थात त्यासाठी शासकीय निधीसह विविध मोठ्या कंपन्यांचा सीएसआर फंड, विविध दाते यांच्या माध्यमातून त्या उपलब्ध होत आहेत. ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट, रुग्णवाहिका, शववाहिका, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, बाईक ॲब्यूलन्स यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. आता या सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी त्यांची योग्य व प्रभावी अंमलबजावणी होणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

जिल्ह्यात आरोग्याच्या सुविधांचा विचार करता एक शासकीय मेडिकल कॉलेज, एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, १४ ग्रामिण रुग्णालये, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन नागरी आरोग्य केंद्र, नर्मदा काठावर दोन तरंगते दवाखाने यांचा समावेश आहे. आता नव्याने या सुविधांची भर पडत आहे. आरोग्याच्या सुविधा व योजनांची भर पडत असली तरी आता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे. यापूर्वीचा जिल्ह्याचा अनुभव फारसा चांगला नाही. तरंगता दवाखान्याचे उदाहरण देता येईल. नर्मदा काठावरील गाव, पाड्यातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी हा उद्देश आहे. मात्र हा उद्देश किती सफल होतो आहे हा संशोधनाचा विषय राहील. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधी डॅाक्टर राहत नाही तर कधी औषधी राहत नाहीत. एमबीबीएस डॉक्टर येण्यास तयार होत नाहीत. आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका नादूरूस्त झाल्यास त्या वेळेवर दुरूस्त होत नाहीत. मिळालेल्या महागड्या उपकरणांचा उपयोग होत नाही, देखभाल, दुरूस्ती अभावी ते निकामी होतात. याचा अनुभव यापूर्वी जिल्हावासीयांंनी घेतलेला आहे.

जिल्ह्यात यापूर्वी आलेल्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांंनी जीव ओतून काम केले, निधी आणला, योजना राबविल्या. काही अधिकारी मात्र केवळ शासकीय नियमाप्रमाणे वागले, त्यांंना जिल्हा विकासाचे, जिल्ह्यातील जनतेचे काहीही सोयरसूतक राहिले नाही. त्यामुळे ते कधी आले आणि कधी गेेले हे जिल्हावासींंच्या फारशा स्मरणात राहिले नाहीत.

आता असलेले जिल्हाधिकारी व इतर अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत आहेत. काही त्रूटी राहत असतीलही परंतू चांगले आहे ते स्मरणात ठेवणारी जिल्ह्यातील जनता आहे. त्यामुळे विद्यामान अधिकाऱ्यांचे प्रयत्न चांगले असले तरी राबविणारी यंत्रणा प्रामाणिक राहिली तरच या सुविधांचा काही उपयोग जनतेला होईल. अन्यथा ‘एक ना धड, भारभर चिंध्या’ ही गत झाल्यास आश्चर्य वाटायला नको.