शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

तळोद्यात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 12:27 PM

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रविवारी तळोदा येथील आदिवासी संस्कृतिक भवनात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने रविवारी तळोदा येथील आदिवासी संस्कृतिक भवनात जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ‘शिक्षण वाचवा जनआंदोलन’ व नवीन येणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर परिसंवादात चर्चा करण्यात आली.परिसंवादाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून भारतीय शिक्षण मंडळ देवगिरी प्रांत सहकार्यवाह प्रा.डॉ.उमेश शिंदे व गौरीशंकर घुमाळ तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे, राजेंद्र चौधरी, जळगाव जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नांद्रे, संघटनमंत्री दिवाकर सरोदे, महिला जिल्हा कार्यवाह मीनल लोखंडे, प्रदीप शेंडे आदी उपस्थित होते. या वेळी आमदार राजेश पाडवी यांनी आमदार झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्यानंतरचे सकारात्मक अनुभव सांगितले. सोबतच तालुक्यासह जिल्ह्यातील व शिक्षक परिषदेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत शिक्षकांचा आवाज बनून समस्या मांडेन, असे आश्वासन दिले. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनीही मनोगत व्यक्त केले.परिसंवाद मत मांडताना प्रा.डॉ.उमेश शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी मत व्यक्त केले व धोरणात समाविष्ट असणाऱ्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. प्रा.घुमाळ यांनी ‘शिक्षण वाचवा जनआंदोलन’ या विषयावर परिसंवादात मत मांडताना शिक्षकांची सामाजिक सद्यस्थिती, शैक्षणिक क्षेत्रातील सद्यस्थिती, बदलणारे अभ्यासक्रम व त्याचा शिक्षण क्षेत्रात होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले.परिसंवादासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हा कार्यवाह प्रकाश बोरसे, जिल्हा सहकार्यवाह दिनेश मोरे, देवेंद्र बोरसे, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष दीपक सोनवणे, तळोदा तालुकाध्यक्ष मधुकर नागरे, शहादा तालुकाध्यक्ष संजय साळी, नवापूर तालुकाध्यक्ष रामू कोकणी, नंदुरबारचे किरण घरटे, धडगावचे भिका पावरा, मनोज चौधरी, रामकृष्ण बागल, आदींसह शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राकेश आव्हाड यांनी केले.या जिल्हास्तरीय शैक्षणिक परिसंवादाला माध्यमिक शिक्षणाधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकाºयांना तसेच तळोदा गटविकास अधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. परंतु या परिसंवादाला सर्व शासकीय प्रमुख पाहुण्यांनी दांडी मारली. यामुळे परिसंवादासाठी उपस्थित जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.