शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा परिसरात पिकांची नुकसानभरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून ...

प्रकाशा व परिसरातील डामरखेडा, शेल्टी, करजई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, बोराळा, सुजालपूर, वर्डे-टेंबे, कलमाडी आदी गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेपासून तर शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत वादळासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे सर्वत्र पाण्याची डबकी साचली आहेत. याचा फटका रब्बी हंगामातील ज्वारी (दादर), हरभरा, गहू या पिकांना बसला असून, पिके जमीनदोस्त झाली आहेत. शेतांमध्ये पाण्याचे मोठमोठे डबके साचले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या दीड दिवसात प्रकाशा परिसरात २८ ते ३० मिमी पावसाची नोंद वि. का. सोसायटीच्या पर्जन्यमापकात झाली आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांची फुलधारणा झाली होती. मात्र अवकाळी पावसामुळे पिकावरील फूल गळून पडल्याने आता दाणे भरले जाणार नाही, परिणामी उत्पन्नही येणार नाही. सोबत मका व तूर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातही अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होऊन अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आता रब्बी हंगामातही अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी रामचंद्र दशरथ पाटील, हरी दत्तू पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, गुड्डू सोमभाई पाटील, सुरेश गोरख पाटील, अरुण ओंकार पाटील, अरुण जावरे, महेंद्र भोई यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.