म्हसावद, सुलतानपूर भागात केळीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:50 AM2020-06-04T11:50:58+5:302020-06-04T11:51:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने रविवारी थैमान घातले होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील म्हसावद ...

Damage to bananas in Mhaswad, Sultanpur area | म्हसावद, सुलतानपूर भागात केळीचे नुकसान

म्हसावद, सुलतानपूर भागात केळीचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने रविवारी थैमान घातले होते. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील म्हसावद व सुलतानपूर या दोन गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, बुधवारी आमदार राजेश पाडवी यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तालुक्यातील राणीपूर, म्हसावद, सुलतानपूर या भागात सोसाट्याच्या वादळी वाºयासह मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील सुलवाडे येथील संजय विक्रम पाटील व म्हसावद येथील छोटू पाटील या शेतकऱ्यांच्या केळी बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी हे शेतकरी अवकाळी पाऊस झाल्यानंतर आपापल्या शेतात पाहणीसाठी गेले असताना तेथे त्यांना वादळी पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या आढळून आल्या. यामुळे व्यथित होऊन त्यांनी या घटनेची माहिती आमदार राजेश पाडवी यांच्यासह तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांना दिली.
शेतकºयांनी माहिती दिल्यानंतर बुधवारी आमदार पाडवी यांनी नुकसानग्रस्त गावात जाऊन शेतकºयांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन करीत नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. त्यांनी याबाबत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे यांना परिस्थितीची माहिती देत म्हसावद व सुलतानपूर या दोन्ही गावांमध्ये नुकसान झालेल्या शेतकºयांचे तत्काळ पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे या दोन्ही गावांव्यतिरिक्त तालुक्याच्या इतर भागात रविवारी कोसळलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची ही माहिती जाणून घेत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या वेळी आमदार पाडवी यांच्यासोबत तालुका कृषी अधिकारी किशोर हाडपे, वीरसिंग पाडवी, छोटू पाटील, संजय पाटील, विठ्ठलराव बागले, प्रवीण वळवी, हितेश मेढेकर उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांचे पंचनामे कृषी विभागामार्फत केले जाती. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला आहे अशांचा अहवाल विमा कंपनीला पाठविला जाईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकºयांचा पीकविमा नसेल अशांचा अहवाल नुकसान भरपाई करीता राज्य शासनाला सादर केला जाईल.
-किशोर हाडपे, तालुका कृषी अधिकारी, शहादा

Web Title: Damage to bananas in Mhaswad, Sultanpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.