शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:11 IST

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी ...

कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले. परंतु ते परिणामकारक ठरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावीचे वर्ग २८ नोव्हेंबरपासून तर शहरी भागातील वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या दहावी व बारावीचे वर्ग शाळांमध्ये सुरू आहेत. शिक्षण विभागाने दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु निश्चित केलेल्या वेळेत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही याची खात्री वाटत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .

दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काठिण्य पातळीवरील काही गद्य व पद्य कमी करण्यात आले आहेत. काही ऐतिहासिक संदर्भाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न वगळण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्वच विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याने एकप्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उर्वरित अभ्यासक्रम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याची तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी-पालक अभ्यासक्रम ठरावीक वेळेत पूर्ण होतो का? याबाबत चिंतीत असताना तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.

अभ्यासक्रमात कपात करूनही अडचणी कायम

दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा विद्यार्थ्यांनाही अध्ययन करणे सोपे जावे यासाठी राज्य शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे. बारावीचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. जवळपास २५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. हा वगळलेला भाग सोडून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.