शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसितांना विश्वासात न घेता जमिनी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पुनर्वसन झालेल्या प्रकल्प बाधितांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार जमिन वाटप करण्याची तरतुद शासनामार्फत करण्यात आली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पुनर्वसन झालेल्या प्रकल्प बाधितांना त्यांच्या आवडी-निवडीनुसार जमिन वाटप करण्याची तरतुद शासनामार्फत करण्यात आली होती. परंतु काथर्देदिगर येथील येथील सहा बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रशासकीय यंत्रणेने परस्पर खराब जमिनी त्यांच्या नावावर केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे.सरदार सरोवर प्रकल्पाच्या विकसासाठी नर्मदा नदी काठावरील गावांची अक्कलकुवा, तळोदा व शहादा तालक्यांमध्ये पूनर्वसन करण्यात आले आहे. त्यात अक्कलकुवा तालुक्यातील डनेल, मुखडी या भागातील बांधवांचे शहादा तालुक्यातील तºहावद येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे पुन्हा जागा कमी पडत असल्यामुळे बहुतांश कुटुंबांचे काथर्देदिगर येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यात प्रथम ८१ कुटुंबांचे पूनर्वसन झाले त्यानंतर टप्प्या-टप्प्याने ४० व २७ असे एकुण १४८ कुटुंबांचा तेथे समावेश करण्यात आला आहे. पूनर्वसित गावांमध्ये अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे शासनामार्फत सांगण्यात आले होते. परंतु काही सुविधा वगळता बहुतांश सुविधा शासनामार्फत उपलब्ध करुन दिल्या नसल्याने काथर्देदिगर ता.शहादा येथील विस्थापितांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.नर्मदा नदीकाठावर मोठ्या जंगलामुळे उदरनिर्वाहासाठी विविध माध्यमातून नागरिकांना भांडवल उपलब्ध होत होते. परंतु पूनर्वसित गावांमध्ये विस्थापित बांधवांना केवळ शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. उदरनिर्वाह व जीवनाचा आधार मिळविण्यासाठी विस्थापितांची धावपळ होत आहे. नर्मदा नदीकाठावर उपलब्ध होणाºया भांडवलासारखे भांडवल काथर्देदिगर येथेही उपलब्ध व्हावे, या अपेक्षेनेच डनेल, मुखडी व अन्य गावांमधील बाधित काथर्देदिगर येथे स्थायिक झालेया बाधितांना त्यांच्या आवडी-नवडी विचारात घेत व त्यांनी होकार दिल्यानंतरच जमिन त्यांच्या नावावर करण्यात याव्या, अशा तरतुदी देखील शासनामार्फत करण्यात आल्या होत्या. परंतु काथर्देदिगर ता.शहादा येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या सहा बाधितांना विश्वासात न घेता शासन यंत्रणेमार्फत त्यांच्या नावावर जमिनी करुन दिल्या आहे. त्यांना काहीही न विचारता नावावर करण्यात आलेल्या जमिनी वेगवेगळ्या कारणांनी खराब निघाल्याचे बाधितांमार्फत सांगण्यात आले आहे.या जमिनी रद्द करीत सहाही शेतकऱ्यांना नवीन जमिनी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करुनही बाधितांच्या समस्येशी दखल घेतली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. मागºया प्रस्तावित असल्याचे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होतांना दिसत नाही. त्यामुळे काथर्देदिगर येथील अन्यायग्रस्त नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला आहे.तक्रार करणाºया शेतकºयांना काहीही न विचारता जमिनी नावावर करण्यात आलेल्या जमिनी प्रत्याक्षात उत्पादन क्षमता कमी असल्याचे आढळलन आल्या. तर काही जमिनींची प्रत खालावलेली असल्याचे देखील या बाधित शेतकºयांमार्फत सांगण्यात येत असून त्यांना कसदार जमिनीची प्रतिक्षा लागली आहे.