शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता बर्ड फ्यूची जिल्हावासीयांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

नंदुरबार : २००६ मधील बर्ड फ्लूच्या कटू आठवणींची धास्ती जिल्हावासीयांनी पुन्हा घेतली आहे. चिकन विक्रीवर १५ ते २० टक्के ...

नंदुरबार : २००६ मधील बर्ड फ्लूच्या कटू आठवणींची धास्ती जिल्हावासीयांनी पुन्हा घेतली आहे. चिकन विक्रीवर १५ ते २० टक्के परिणाम झाला आहे. पोल्ट्री फार्मधारकांनी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नाही. त्यामुळे अफवा पसरवू नये. जिल्हा प्रशासनाचे या बाबीकडे लक्ष असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात २००६ मध्ये बर्ड फ्लू आला होता त्यावेळी नवापूरसह जिल्ह्यातील अनेक पोल्ट्री फार्ममधील पक्षी दगावले होते. त्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. साधारणत: वर्षभर हा व्यवसाय रुळावर येण्यास लागला होता. आतादेखील देशातील काही राज्यांत बर्ड फ्लूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात देखील त्याबाबत सतर्कता बाळगली जात आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने त्यासाठी पोल्ट्री फार्मधारकांना आवाहन केले आहे. आवश्यक त्या उपाययोजना करणे आणि तशी काही लक्षणे आढळल्यास तातडीने कळविण्याचे सूचित केले आहे. जिल्हावासीयांनी देखील याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये. दरम्यान, चिकन व अंडी विक्रीवर काहीसा परिणाम झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी

n हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उद्भवतो; परंतु तो पाळीव कोंबड्यांमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस १६५ अंशावर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. पोल्ट्री फार्मधारकांना वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.