शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वराह मृत झाल्याच्या खोडसाळ दूरध्वनीने प्रशासनाची बोरदला तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:31 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील बोरद येथे एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा खोडसाळपणे फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील बोरद येथे एकाच दिवशी तब्बल २०० वराह मेल्याचा खोडसाळपणे फोन थेट पशुसंवर्धन आयुक्तांना गेल्यानंतर ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्रीच या विभागाची स्थानिक यंत्रणा खडबडून जागी झाली व गाव गाठले होते. तेथे गेल्यानंतर असा कोणताच प्रकार घडलेला नव्हता; परंतु पथकाला पाहून गावकरीदेखील अवाक्‌ झाले होते. गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, पथकाने गावकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. मात्र, अफवांमुळे कर्मचारी हैराण झाले होते. असा खोडसाळपणा करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  तळोदा तालुक्यातील बोरद येथे शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल २०० वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू झाल्याचा फोन थेट पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांना करण्यात आला होता. साहजिकच ‘बर्ड फ्लू’च्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ आरोग्य यंत्रणेने जिल्हा पशुसंवर्धन विभागाला व या विभागाने स्थानिक पशुसंवर्धन विभागाला अशा फोन आल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली होती. या विभागाचे वैद्यकीय पथक रात्रीच बोरद गावात दाखल झाले होते. हा प्रकार ज्या ठिकाणी घडल्याचे सांगण्यात आले होते, तेथे घटनेची पाहणी केली असता असा कुठलाच प्रकार पथकाला आढळून आला नाही. पथकाने संपूर्ण गावात पाहणी केली. प्रत्यक्ष गावकऱ्यांनाही विचारणा केली असता गेल्या आठवड्यात काही वराह मेल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, अशा खोडसाळपणामुळे आरोग्य कर्मचारी हैराण झाले होते. केवळ दोन वराह मृत्युमुखी पडल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी पुन्हा पथकाने गावऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय ‘बर्ड फ्लू’बाबत खबरदारी घेऊन जागृती करण्याचे आवाहनही केले. अशा अफवा कोणी पसरवू नयेत. आधीच बर्ड फ्लू विषयी लोकांमध्ये कमालीची भीती आहे. यापुढे अशा अफवा कोणी पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

वराहांच्या बंदोबस्ताबाबत यंत्रणा घेत नाही ठोस भूमिकाशहाराबरोबरच ग्रामीण भागात वराहांचा मोठा वावर आहे. शिवाय या मोसमात वराहांचा अचानक मृत्यू कुठेना कुठे होत आहे. बर्ड फ्लूच्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आधीच कोरोनाची भीती आहे. त्यात आता बर्ड फ्लूची भर पडली आहे, असे असताना वराहांच्या वाढत्या उपद्रवाबाबत ग्रामपंचायती व नगर पालिका प्रशासनाने ठोस अशी भूमिका घेतली नसल्याचा आरोप आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळे वराह पालकांचे फावत आहे. केवळ तेवढ्यापुरता दिखावा करीत पुन्हा ‘जैसे थे’ चित्र होते. वास्तविक या साथींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ महसूल प्रशासन व पशुवैद्यकीय प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कारण आजही शहराबरोबरच ग्रामीण भागातही वराहांची संख्या मोठी  आहे. वराह मालकही आपल्या वराहांना लसीकरण करण्यास पशुआरोग्य यंत्रणेला सहकार्य करायला तयार नाहीत. दरम्यान, बोरद गावातील संपूर्ण वराहांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय शासनाच्या सर्वच यंत्रणांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

बोरद गावात एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात वराहांचा मृत्यू  झाल्याची घटना घडल्याचे वरिष्ठ अधिकात्याने कळविले होते. त्यानुसार स्थानिक वैद्यकीय पथकाला तात्काळ घटना स्थळी पाठविले होते. तथापि, गेल्या आठवड्यात दोन वराह मृत्युमुखी पडल्याची घटना घडली  होती.  - डॉ.यु.डी. पाटील, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषद नंदुरबार