शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 12, 2024 16:48 IST

नांदेड जिल्ह्यात ३.८४ लाख क्विंटल कापूस खरेदी : खासगी व्यापाऱ्यांकडून ७४०० पर्यंत भाव

नांदेड : जिल्ह्यातील विविध नऊ खरेदी केंद्रांवर सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांकडून १२ मार्चपर्यंत ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर १७ हजार पार गेले असले तरी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला या वर्षात ६,५०० ते ७,४०० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळाला. त्यामुळे पांढरे सोने कधी झळाळणार, याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे.

यावर्षी सुरुवातीला वेळेवर पाऊस पडला नसल्याने कापसाची लागवड उशिराने झाली होती. त्यामुळे कापूस वेचणीलाही विलंब झाला; पण मागील तीन महिन्यांपासून कापूस विक्रीसाठी बाजारात आलेला असून, १२ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यात खासगी व्यापाऱ्यांनी ६,७०० ते ७,४०० रुपयांचा भाव मिळाला. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. मात्र, यंदा साडेसात हजारांपेक्षा जास्त दर वाढले नाहीत. कापसाचे उत्पादन कमी असले तरी दर का वाढत नाहीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

‘सीसीआय’ची ७१ हजार ६२७ क्विंटल खरेदीजिल्ह्यात ‘सीसीआय’ने भोकर, धर्माबाद, तामसा (हदगाव), नांदेड, नायगाव, कुंटूर, बिलोली, किनवट व माहूर या ठिकणी नऊ खरेदी केंद्र सुरू केले आहेत; पण १२ मार्चपर्यंत धर्माबाद ३४ हजार क्विंटल, तामसा ६,५०० क्विंटल, नांदेड ३,८३३ क्विंटल, नायगाव १५,२६० क्विंटल, कुंटूर ११,६२२ क्विंटल, किनवट ४१२ क्विंटल याप्रमाणे ७१ हजार ६२७ क्विंटल आजतागायत खरेदी झालेली आहे.

भोकर केंद्रावर सर्वाधिक खरेदीजिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून भोकर केंद्रावर सर्वाधिक १ लाख ८३ हजार ३३९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. कापसाला ६,५०० ते ७,४०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर भोकर पाठोपाठ धर्माबाद खरेदी केंद्रावर ४७ हजार ५९८ क्विंटल, तामसा ८१ हजार ८५४ क्विंटल तर नांदेड येथील खरेदी केंद्रावर ३२९ याप्रमाणे एकूण ३ लाख १३ हजार १२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा कापसाचा उतारा घटलाजिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला.

काही राज्यांत एमएसपीपेक्षा जादा दरकेंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत. तसा कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारांवर गेले होते; पण यंदा शासनाने कापसाला अधिक भाव मिळावा, यासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

टॅग्स :NandedनांदेडcottonकापूसFarmerशेतकरी