शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 12, 2024 16:48 IST

नांदेड जिल्ह्यात ३.८४ लाख क्विंटल कापूस खरेदी : खासगी व्यापाऱ्यांकडून ७४०० पर्यंत भाव

नांदेड : जिल्ह्यातील विविध नऊ खरेदी केंद्रांवर सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांकडून १२ मार्चपर्यंत ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर १७ हजार पार गेले असले तरी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला या वर्षात ६,५०० ते ७,४०० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळाला. त्यामुळे पांढरे सोने कधी झळाळणार, याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे.

यावर्षी सुरुवातीला वेळेवर पाऊस पडला नसल्याने कापसाची लागवड उशिराने झाली होती. त्यामुळे कापूस वेचणीलाही विलंब झाला; पण मागील तीन महिन्यांपासून कापूस विक्रीसाठी बाजारात आलेला असून, १२ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यात खासगी व्यापाऱ्यांनी ६,७०० ते ७,४०० रुपयांचा भाव मिळाला. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. मात्र, यंदा साडेसात हजारांपेक्षा जास्त दर वाढले नाहीत. कापसाचे उत्पादन कमी असले तरी दर का वाढत नाहीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

‘सीसीआय’ची ७१ हजार ६२७ क्विंटल खरेदीजिल्ह्यात ‘सीसीआय’ने भोकर, धर्माबाद, तामसा (हदगाव), नांदेड, नायगाव, कुंटूर, बिलोली, किनवट व माहूर या ठिकणी नऊ खरेदी केंद्र सुरू केले आहेत; पण १२ मार्चपर्यंत धर्माबाद ३४ हजार क्विंटल, तामसा ६,५०० क्विंटल, नांदेड ३,८३३ क्विंटल, नायगाव १५,२६० क्विंटल, कुंटूर ११,६२२ क्विंटल, किनवट ४१२ क्विंटल याप्रमाणे ७१ हजार ६२७ क्विंटल आजतागायत खरेदी झालेली आहे.

भोकर केंद्रावर सर्वाधिक खरेदीजिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून भोकर केंद्रावर सर्वाधिक १ लाख ८३ हजार ३३९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. कापसाला ६,५०० ते ७,४०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर भोकर पाठोपाठ धर्माबाद खरेदी केंद्रावर ४७ हजार ५९८ क्विंटल, तामसा ८१ हजार ८५४ क्विंटल तर नांदेड येथील खरेदी केंद्रावर ३२९ याप्रमाणे एकूण ३ लाख १३ हजार १२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा कापसाचा उतारा घटलाजिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला.

काही राज्यांत एमएसपीपेक्षा जादा दरकेंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत. तसा कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारांवर गेले होते; पण यंदा शासनाने कापसाला अधिक भाव मिळावा, यासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

टॅग्स :NandedनांदेडcottonकापूसFarmerशेतकरी