शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 12, 2024 16:48 IST

नांदेड जिल्ह्यात ३.८४ लाख क्विंटल कापूस खरेदी : खासगी व्यापाऱ्यांकडून ७४०० पर्यंत भाव

नांदेड : जिल्ह्यातील विविध नऊ खरेदी केंद्रांवर सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांकडून १२ मार्चपर्यंत ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर १७ हजार पार गेले असले तरी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला या वर्षात ६,५०० ते ७,४०० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळाला. त्यामुळे पांढरे सोने कधी झळाळणार, याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे.

यावर्षी सुरुवातीला वेळेवर पाऊस पडला नसल्याने कापसाची लागवड उशिराने झाली होती. त्यामुळे कापूस वेचणीलाही विलंब झाला; पण मागील तीन महिन्यांपासून कापूस विक्रीसाठी बाजारात आलेला असून, १२ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यात खासगी व्यापाऱ्यांनी ६,७०० ते ७,४०० रुपयांचा भाव मिळाला. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. मात्र, यंदा साडेसात हजारांपेक्षा जास्त दर वाढले नाहीत. कापसाचे उत्पादन कमी असले तरी दर का वाढत नाहीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

‘सीसीआय’ची ७१ हजार ६२७ क्विंटल खरेदीजिल्ह्यात ‘सीसीआय’ने भोकर, धर्माबाद, तामसा (हदगाव), नांदेड, नायगाव, कुंटूर, बिलोली, किनवट व माहूर या ठिकणी नऊ खरेदी केंद्र सुरू केले आहेत; पण १२ मार्चपर्यंत धर्माबाद ३४ हजार क्विंटल, तामसा ६,५०० क्विंटल, नांदेड ३,८३३ क्विंटल, नायगाव १५,२६० क्विंटल, कुंटूर ११,६२२ क्विंटल, किनवट ४१२ क्विंटल याप्रमाणे ७१ हजार ६२७ क्विंटल आजतागायत खरेदी झालेली आहे.

भोकर केंद्रावर सर्वाधिक खरेदीजिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून भोकर केंद्रावर सर्वाधिक १ लाख ८३ हजार ३३९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. कापसाला ६,५०० ते ७,४०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर भोकर पाठोपाठ धर्माबाद खरेदी केंद्रावर ४७ हजार ५९८ क्विंटल, तामसा ८१ हजार ८५४ क्विंटल तर नांदेड येथील खरेदी केंद्रावर ३२९ याप्रमाणे एकूण ३ लाख १३ हजार १२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा कापसाचा उतारा घटलाजिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला.

काही राज्यांत एमएसपीपेक्षा जादा दरकेंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत. तसा कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारांवर गेले होते; पण यंदा शासनाने कापसाला अधिक भाव मिळावा, यासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

टॅग्स :NandedनांदेडcottonकापूसFarmerशेतकरी