शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:28 IST

शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांसह भाविक त्रस्त पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी

श्रीक्षेत्र माहूर : शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नळाद्वारे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत़शहरात सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी पाणीटंचाई जाणवू नये म्हणून प्रयत्न करत नदीत पाणी नसेपर्यंत मेरुवाळा तलावातून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरविले़ नदीत पाणी येताच मोटार जळणे पाईपलाईन फुटणे, तसेच पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून ९४ पैकी फक्त मजीर्तील ४ वॉल्व्हला दिवसभरात पाणी सोडणे इत्यादी प्रकार सुरू झाला. काही काही वॉर्डात पाणी न सोडण्याच्या प्रकारामुळे नगरसेवकही त्रस्त झाले आहेत.शहरात निर्जळी असल्याने नागरिक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडे गेले असता त्यांनी आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले़ निवडणूक लागल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून त्यांच्या घरी टँकरने पाणी आणावे लागत आहे़ दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबद्दल कोणीच शब्द काढायला तयार नाही़ तर दुसरीकडे माहूर येथील नागरिक तलाव, कुंड, स्वच्छ करण्यासाठी, पाणीपातळी वाढावी म्हणून श्रमदानातून गाळ काढत असून असलेले पाणी शहरात वाटपात नगरपंचायत अकार्यक्षम ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ शहरातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़श्रमदानातून काढला गाळ,पवित्र जागमाता कुंडही होणार स्वच्छशहरवासियांनी साखळी तयार करून जागमाता कुंडाशेजारी मातृतीर्थ रस्त्यावरील काशीतीर्थ कुंड स्वच्छ व गाळ काढण्यासाठी श्रमदान सुरू केल्याने तलाव, कुंड, झरे पाण्याने खळाळत वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ अंबादास श्रीकृष्ण जोशी, वेदाध्ययन ज्ञानपीठ येथील प्रधानाचार्य निलेश वसंत केदार गुरुजी, श्री परशुराम स्थापित संकटमोचन गणपती मंदिर (श्री दत्तयोग आश्रम माहूरगढ) चे महंत कपिले गुरुजी, समाजसेविका प्रणिता जोशी, यांनी विद्यार्थी व मित्र परिवारास सोबत घेत २९ रोजी काशीतीर्थ कुंड स्वच्छतेस सुरुवात केली़ शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याच्या पौराणिक स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन श्रमदानातून होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी येथे भेट देवून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना ही माहिती दिली. एकलारे बंधूंनी जेसीबी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई