शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:28 IST

शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देशहरातील नागरिकांसह भाविक त्रस्त पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी

श्रीक्षेत्र माहूर : शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नळाद्वारे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत़शहरात सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी पाणीटंचाई जाणवू नये म्हणून प्रयत्न करत नदीत पाणी नसेपर्यंत मेरुवाळा तलावातून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरविले़ नदीत पाणी येताच मोटार जळणे पाईपलाईन फुटणे, तसेच पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून ९४ पैकी फक्त मजीर्तील ४ वॉल्व्हला दिवसभरात पाणी सोडणे इत्यादी प्रकार सुरू झाला. काही काही वॉर्डात पाणी न सोडण्याच्या प्रकारामुळे नगरसेवकही त्रस्त झाले आहेत.शहरात निर्जळी असल्याने नागरिक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडे गेले असता त्यांनी आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले़ निवडणूक लागल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून त्यांच्या घरी टँकरने पाणी आणावे लागत आहे़ दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबद्दल कोणीच शब्द काढायला तयार नाही़ तर दुसरीकडे माहूर येथील नागरिक तलाव, कुंड, स्वच्छ करण्यासाठी, पाणीपातळी वाढावी म्हणून श्रमदानातून गाळ काढत असून असलेले पाणी शहरात वाटपात नगरपंचायत अकार्यक्षम ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ शहरातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़श्रमदानातून काढला गाळ,पवित्र जागमाता कुंडही होणार स्वच्छशहरवासियांनी साखळी तयार करून जागमाता कुंडाशेजारी मातृतीर्थ रस्त्यावरील काशीतीर्थ कुंड स्वच्छ व गाळ काढण्यासाठी श्रमदान सुरू केल्याने तलाव, कुंड, झरे पाण्याने खळाळत वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ अंबादास श्रीकृष्ण जोशी, वेदाध्ययन ज्ञानपीठ येथील प्रधानाचार्य निलेश वसंत केदार गुरुजी, श्री परशुराम स्थापित संकटमोचन गणपती मंदिर (श्री दत्तयोग आश्रम माहूरगढ) चे महंत कपिले गुरुजी, समाजसेविका प्रणिता जोशी, यांनी विद्यार्थी व मित्र परिवारास सोबत घेत २९ रोजी काशीतीर्थ कुंड स्वच्छतेस सुरुवात केली़ शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याच्या पौराणिक स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन श्रमदानातून होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी येथे भेट देवून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना ही माहिती दिली. एकलारे बंधूंनी जेसीबी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई