शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट, २३५ योजनांची करणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:31 IST

चौकट....... सध्या एकही टँकर सुरू नाही...... पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या ...

चौकट.......

सध्या एकही टँकर सुरू नाही......

पाण्याच्या उपलब्धतेमुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात टँकरची गरज भासलेली नाही. मात्र येणाऱ्या दिवसात ३४ गावे आणि १४ वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ येऊ शकते. यासाठी मार्च महिन्याकरिता ४९ टँकरचे नियोजन करण्यात आले असून यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजारांचा खर्च अपेक्षित आहे.

असा आहे कृती आराखडा....

मार्च महिन्यातील संभाव्या पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी प्रशासनाने ३० कोटी ४२ लाखांचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये ६०८ विंधन विहिरी, २३५ नळ योजनांची दुरुस्ती, १६९ पूरक नळ योजना, १२०२ विंधन विहिरींची दुरुस्ती तसेच ४३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केले आहे.

विंधन विहिरीवर राहणार भर...

प्रशासनाने १५६ वाड्या आणि ४२७ गावांसाठी विंधन विहिरी घेण्याचे निश्चित केले आहे. यासाठी ३ कोटी ९५ लाख खर्च अपेक्षित आहे. त्याच वेळी २७९ गावे आणि ९० वाड्यांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये खर्चून खासगी विंधन विहीरींचे अधिग्रहण करण्यात येणार असून त्याद्वारे टंचाईग्रस्त भागाला पाणी पुरविण्यात येणार आहे.

४९ टँकरची लागणार गरज...

मार्च महिन्यात अद्यापपर्यंत जिल्ह्यात एकही टँकर सुरू नाही. मात्र ३१ मार्चपर्यंत काही भागात पाणीटंचाई निमार्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी ३४ गावे आणि १४ वाड्यांना ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १ कोटी १८ लाख ८० हजार खर्च अपेक्षित आहे.