शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

संपूर्ण जिल्ह्यात केवळ लोहा तालुक्यातच दुष्काळ आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:21 IST

जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, राजकीय पर्यटनासाठी ज्यांनी केवळ लोहा तालुक्याचा दुष्काळी दौरा केला त्यांना जिल्ह्यात इतर तालुक्यातील दुष्काळ दिसला नाही काय? दुष्काळ फक्त लोहा तालुक्यात आहे काय? असा प्रश्न काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा आठवले यांना सवाल

नांदेड : जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परंतु, राजकीय पर्यटनासाठी ज्यांनी केवळ लोहा तालुक्याचा दुष्काळी दौरा केला त्यांना जिल्ह्यात इतर तालुक्यातील दुष्काळ दिसला नाही काय? दुष्काळ फक्त लोहा तालुक्यात आहे काय? असा प्रश्न काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केला आहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोहा तालुक्यातील सुनेगाव तलावासह काही गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली. राजकीय पर्यटनाच्या निमित्ताने का होईना त्यांनी लोहा तालुक्याला भेट दिली, ही बाब जरी चांगली असली तरी लोहा तालुक्याप्रमाणेच जिल्ह्यातील मुखेड, देगलूर, नायगाव, बिलोली, भोकर, उमरी, धर्माबाद या तालुक्यालासुद्धा दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. जिल्ह्यात गंभीर दुष्काळ असताना शासनाचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी लोहा तालुक्यातील काही गावांनाच भेटी दिल्या. याऐवजी थोडी तसदी घेवून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेणे अपेक्षित होते.त्यासोबतच इतर तालुक्यांतील काही दुष्काळग्रस्त गावांना भेटी देवून दुष्काळ निर्मूलनासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास देणे गरजेचे होते. हे करण्याऐवजी आठवले यांनी मात्र लोहा तालुक्यात केवळ पर्यटन केले काय? असा सवाल काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी केला आहे. नांदेड दौºयावर आलेल्या रामदास आठवले यांनी मोदी यापुढे थापा मारणार नाहीत असे म्हटले. याचाच अर्थ यापूर्वी मोदींनी केवळ थापाच मारल्या. नरेंद्र मोदी थापाडे आहेत हेच जणू त्यांच्या विधानातून सिद्ध होते.निवडणूक निकाल लागण्याआधीच गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या भाजपा उमेदवाराच्या लग्नाला रामदास आठवले यांनी उपस्थिती लावण्याची घाई करु नये. २३ मे च्या निकालाची वाट पहा. असा आततायीपणा करण्याची सवय भाजप उमेदवाराप्रमाणे आठवले यांनाही लागली असल्याचा टोला आ. वसंतराव चव्हाण, आ. अमिताताई चव्हाण, माजी आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, माजी आ. रावसाहेब अंतापूरकर, पीआरपीचे राज्य उपाध्यक्ष बापूराव गजभारे यांनी लगावला आहे.पालकमंत्री अद्याप जिल्ह्यात फिरकलेच नाहीतनिवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली सरकार सर्वपक्षीय बैठका घेत नव्हते. परंतु आता आयोगाने महाराष्ट्राची आचारसंहिता दुष्काळावर निर्णय घेण्यासाठी शिथिल केली आहे. असे असतानासुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नांदेडमध्ये आले नाहीत. या जिल्ह्यातील जनतेचे हाल काय होत आहेत, याकडे शासन गांभीर्याने पाहत नाही.दुष्काळ निवारणासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ बैठक घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळPoliticsराजकारणcongressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवले