शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची किमान उत्पन्न योजना सर्वसामान्यांसाठी लाभदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:49 IST

राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत.

ठळक मुद्देअशोक चव्हाण: ‘आरएसएस’ला काँग्रेसचा वैचारिक विरोध

नांदेड : राहुल गांधी यांनी जाहीर केलेल्या किमान उत्पन्न योजनेवर भाजपा टिका करीत आहे. काँग्रेसची ही योजना चांगली असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणल्याचे सांगत त्यातूनच या योजनेवर टीका होत आहे. काँग्रेसकडे मनमोहन सिंग, पी. चिदंबरम यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ आहेत. सरकार कसे चालवायचे ? सरकारसाठी रिसोर्सेस कसे उभे करायचे? याचा अभ्यास या तज्ज्ञांचा आहे. त्यामुळे काँग्रेसची ही योजना आमचे सरकार आल्यास आम्ही चांगल्या पद्धतीने राबविण्यात येईल, असा निर्धार खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.बुधवारी सायंकाळी ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजपाला तुम्ही विरोधक मानता तर मग त्यांच्या ऐवजी केवळ काँग्रेसवरच टिकेची झोड का? असा प्रश्न करीत केवळ काँग्रेसवर टीका केली जात असल्यामुळेच वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यातूनच ‘बी-टीम’ कोण ? असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करतात, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. एमआयएमने काँग्रेस बुडण्याची चिंता करु नये, काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ते काँग्रेसच्या बळकटीसाठी कटीबद्ध आहेत. त्यांनी काय ते एमआयएमचे पहावे, अशी टीप्पनीही चव्हाण यांनी केली.प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी लोकसभा उमेदवाराच्या अनुषंगाने काँग्रेस आरएसएस समर्थक असल्याचा आरोप केला असल्याचे विचारले असता, काँग्रे्रसचा राष्टÑीय स्वयंसेवक संघाशी दुरान्वयेही संबंध नाही.काँग्रेसची विचारधारा स्वतंत्र आहे. आरएसएसशी आमचा वैचारिक विरोध आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांची समर्थक होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. खरे तर प्रकाश आंबेडकर यांनी सेना-भाजप विरोधात बोलले पाहिजे. मात्र ते काँग्रेसवर टीका करीत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांचीही भूमिका स्पष्ट होत नाही. या अशा विधानामुळेच भाजपाची ‘बी-टीम’ कोण? असा प्रश्न चर्चेत येतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती़

  • जिल्ह्याने सातत्याने काँग्रेसच्या बाजूने कौल दिलेला आहे़ जनतेचे काँग्रेसशी अतुट असे नाते आहे़ त्यामुळे नांदेडमध्ये विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी येथील सुजाण मतदार काँग्रेसची साथ सोडणार नाहीत़ नांदेडच्या सर्वांगिण विकासासाठी मी कटीबद्ध आहे़ माझ्यावरील विश्वासाचे हे नाते या निवडणूकीच्या माध्यमातून अधिक मजबूत होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला़
टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक