शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

किनवट राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:53 AM

दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीनंतर सेना-भाजपात संचारला उत्साह

गोकुळ भवरे।किनवट : दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या किनवट मतदारसंघात माहूरची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेसकडे तर किनवटची सत्ता भाजपकडे आहे़ आता आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा हा अभेद्य किल्ला सर करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने व्यूहरचना चालविली आहे़आदिवासी बंजारा बहुल किनवट विधानसभा मतदारसंघात नऊ वेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला किनवट विधानसभा मतदारसंघ भाजप-सेना युती हिसकावून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे़ मात्र भाजपात अर्धा डझनहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी न मिळालेल्यांची भूमिका काय असणार? हे काळच सांगेल़राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडी आणि भाजप-सेना युती झाली नाही अणि २०१४ प्रमाणे स्वतंत्र लढले तर आघाडी, युतीला येत्या काळात वंचित बहुजन आघाडी व माजी आमदार भीमराव केराम यांची अपक्ष उमेदवारी डोकेदुखी ठरेल. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर भाजपासाठी असलेल्या या मतदारसंघावर शिवसेना दावा करीत असल्याचे त्यांच्या हालचाली वरून दिसून येत आहे़लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांना किनवट विधानसभा मतदारसंघात पन्नास टक्केच्यावर मतदान मिळाल्याने शिवसेनेचे मनोबल वाढले आहे़ हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे़ किनवट मतदारसंघात भाजप लयास गेली होती़ भाजपचे कमळ फुलवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जवळचे मानले जाणारे भाजप नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांनी प्रयत्न करून किनवट नगरपरिषदेवर व पंचायत समितीवर भगवा फडकवून आपली ताकद दाखवून दिली़ मात्र असे असतानाही एक गट त्यांचे नेतृत्व मानायला तयार नाही़ ते नेहमी त्यांच्या विरोधात सक्रिय असतात़ आता तर धरमसिंग राठोड व इतर अर्धा डझन भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक आहेत़ शिवसेनेला हा मतदारसंघ सुटला तर ज्योतीबा खराटे, युवा नेते सचिन नाईक हे दोघे इच्छुक आहेत़राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीची उमेदवारी विद्यमान आ़ प्रदीप नाईक यांना बहाल होईल; पण गटबाजी उफळलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची भूमिका ‘पायात पाय’ घालण्याची राहील हे आ़ प्रदीप नाईकांना ठाऊक आहे़ पण काँग्रेसचा एक प्रबळ गट मात्र नाईकांच्या बाजूने भक्कमपणे राहणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीला व भाजप सेना युतीला अपक्ष उमेदवारी दाखल करणारे माजी आ़भीमराव केराम व बहुजन वंचित आघाडी डोकेदुखी ठरेल माजी आ़भिमराव केराम यांना एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली तर मग मात्र निवडणुकीचे चित्र फार वेगळे राहील हे तितकेच खरे़

टॅग्स :NandedनांदेडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस