शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

भोकर तालुक्यात ७५७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST

भोकर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांकरिता निवडणूक रिंगणात उभे असलेल्या ७५७ उमेदवारांचे भवितव्य ४७ हजारांपेक्षा अधिक ...

भोकर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांकरिता निवडणूक रिंगणात उभे असलेल्या ७५७ उमेदवारांचे भवितव्य ४७ हजारांपेक्षा अधिक मतदारांनी ईव्हीएम यंत्राद्वारे मतदानाचा हक्क बजावून सीलबंद केले आहे. गावपुढाऱ्यांच्या चुरशीमध्ये काही गावात झालेला किरकोळ वाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

तालुक्यातील ६६ पैकी ६३ ग्रामपंचायतींच्या ५१३ सदस्य पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, मतदान प्रक्रियेविना १२ ग्रामपंचायतींचे व विविध प्रभागातील १५ असे एकूण १७० सदस्य बिनविरोध निवडून आले तर अनुसूचित जमातीच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्या जागा रिक्त आहेत. यामुळे उर्वरित ५१ ग्रामपंचायतींच्या ३३३ सदस्य पदांसाठी १४१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्राद्वारे ५६४ कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मतदान प्रक्रिया घेण्यात आली. नियोजित वेळेत पार पडलेल्या मतदानादरम्यान मतदान केंद्रावर नवमतदार, महिला, वृद्ध मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी उमेदवारांसह पॅनेलप्रमुख मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांची विनवणी करत होते, तर काही मतदार स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करत होते.

भोकर तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत २७ हजार ५७७ स्त्रिया व २८ हजार ९३७ पुरुष असे एकूण ५६ हजार ५१४ मतदार होते. त्यातील स्त्रिया २२ हजार ७९३ व पुरुष २४ हजार ४३७ असे एकूण ४७ हजार २३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ८३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उपविभागीय अधिकारी तथा तालुका समन्वयक राजेंद्र खंदारे, तहसीलदार तथा निवडणूक प्राधिकरण अधिकारी भरत सूर्यवंशी, नायब तहसीलदार संतोष कामठेकर, सुनील पांडे, रेखा चामनार, पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.

चौकट-

तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भोसी, किनी, रावणगाव, रायखोड, हळदा, सायाळ, बटाळा आदी गावांमध्ये चुरशीची लढत झाली तर हस्सापूर, चितगिरी, कामनगाव, जामदरी येथे परस्परविरोधी गट आमने-सामने आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता.