शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

‘आत्मनिर्भर’! अभियंता तरुणाने निवडला पाेहे विक्री व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2021 9:15 AM

Nagpur news उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील छोट्याशा गावातील अभियंता झालेल्या तरुणाच्या वाट्यालासुद्धा असाच कटू अनुभव आला. काय करावे, काय नाही अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता पाेहे विक्रीचा व्यवसाय त्याने निवडला.

ठळक मुद्देरणरणत्या उन्हात तीन दिवस, तीन रात्रीचा प्रवास

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीमुळे सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली. असंख्य बेरोजगारांनाही याची झळ सोसावी लागली. अनेक वर्षांपासून मोठ्या शहरात, महानगरात नाेकरीच्या निमित्ताने स्थिरावलेल्या असंख्य तरुणाईने कोरोनाच्या संकटकाळात ‘घरवापसी’ केली. यापैकी बहुतांश तरुण ‘वर्क फॉर्म होम’मध्ये गुंतले असून, अनेकांना नाेकरी गमवावी लागली. उमरेड तालुक्यातील सिर्सी येथील छोट्याशा गावातील अभियंता झालेल्या तरुणाच्या वाट्यालासुद्धा असाच कटू अनुभव आला. काय करावे, काय नाही अशा द्विधा मन:स्थितीत असतानाच कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता पाेहे विक्रीचा व्यवसाय त्याने निवडला. निखिल तानबाजी राऊत असे या तरुणाचे नाव आहे. कोरोनामुळे नाेकरी गेली असली तरी छोटाशा व्यवसायातून ‘आत्मनिर्भर’तेची वाटचाल केल्याचा विश्वास त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

निखिल राऊतने मराठी माध्यमातून आपले दहावीपर्यंतचे शिक्षण सिर्सी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यालयात पूर्ण केले आहे. त्यानंतर नूतन आदर्श महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला. उमरेड ओम पॉलिटेक्निक येथे पॉलीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील सूर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअर बनला.

अशातच कॅम्पस मुलाखतीतून सन २०१९ ला हैद्राबाद येथील एका कंपनीत नाेकरी मिळाली. अत्यंत गरीब परिस्थिती. त्यातच सुमारे दहा वर्षांपूर्वी वडिलांचे निधन, अशा कठीण चक्रात असताना मिळालेली नाेकरी स्वप्नपूर्तीची पावतीच ठरणारी होती. अशातच कोरोनाचे वादळ आले. नाेकरी गमवावी लागली. हैद्राबाद येथून उमरेडकडे परतीचा प्रवास करावा लागला.

उमरेड येथे आल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने त्याने मोहपा चौक परिसरात रस्त्याच्या कडेला पाेहे विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला. यात चंद्रशेखर वाघमारे यांनी मोलाची मदत दिली. मी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असले तरी अशा परिस्थितीत मिळेल ते मेहनतीने काम करायला कमीपणा कसला. निदान खर्च वजा जाता आम्ही आनंदाने जगू शकतो, हे बळ मला या छोट्याशा उद्योगातून मिळाल्याची प्रतिक्रिया निखिलने व्यक्त केली. यामध्ये आई यमुना यांची हिंमत लाखमोलाची असल्याचीही बाब त्याने सांगितली.

रणरणत्या उन्हात ‘घरवापसी’

मे २०२० ला नाेकरी गेल्यानंतर हैद्राबाद येथून निखिल दोन अन्य मित्रांसमवेत नागपूरच्या दिशेने पायीच पायपीट करीत निघाला. तीन दिवस, तीन रात्र पोटात अन्नाचा कण नाही. केवळ पाणी आणि नारळपाणी याचाच पोटाला आधार घेत निखिलने रणरणत्या उन्हात खडतर प्रवास केला. त्यानंतर अदिलाबाद ते नागपूर असा प्रवास ट्रकच्या माध्यमातून करीत तो उमरेड येथे पोहोचला. हा प्रसंग व्यक्त करताना त्याने दाखविलेली हिंमत अंगावर काटा आणणारीच आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके