शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यातूनच यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित

By admin | Updated: November 26, 2014 01:04 IST

प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने

धनराज वंजारी : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान
नागपूर : प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने समाजमनाला उभारी दिली आणि समाजाला समोर नेले. आपले साहित्य आणि संतपरंपरांचे संचित घेऊनच यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व साकारले. कलांवर प्रेम आणि जगभरातल्या साहित्याच्या वाचनातून त्यांची सामाजिक दृष्टी व्यापक झाली होती. त्यामुळेच त्यांनी रचलेल्या पायावर आज महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे. साहित्यातून यशवंतरावांची समाजदृष्टी विकसित झाली, असे मत निवृत्त सहायक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानातर्फे यशवंतरावांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘यशवंतराव चव्हाण यांची साहित्यिक व सामाजिक दृष्टी’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. हा कार्यक्रम बाबूराव धनवटे सभागृहात मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे, रमेश बोरकुटे, अजय पाटील, डॉ. प्रमोद मुनघाटे उपस्थित होते. वंजारी म्हणाले, यशवंतरावांना व्यापक सांस्कृतिक दृष्टी होती. त्यामुळेच महाराष्ट्राचे संस्थापक ते आहेत. शिवाजी महाराजांप्रमाणेच यशवंतरावांनीही सामान्य तळागाळातल्या माणसासाठी प्रामाणिक काम केले. त्यामुळेच त्यांना प्रति शिवाजी असेही म्हटले जात होते. आरक्षण देतानाही केवळ कोटा भरणे हा त्यांचा दृष्टिकोन नव्हता तर शोषितांना यानिमित्ताने मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कळकळीने काम केले. यासाठीच ते गावकुसाबाहेर असलेल्या तमासगीरांच्या तमाशात जायचे. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून तमाशातील कलावंतांना त्यांनी प्रोत्साहन दिले. ज्या वैचारिक, साहित्यिक, सामाजिक दृष्टीने राजकारण करावे लागते ते आदर्शवत राजकारण यशवंतरावांनी केले. मूल्यांचे अवमूल्यन होत असताना नव्या पिढीला त्यांचे कार्य समजून घेतल्याशिवाय विकास साधता येणार नाही. भाषा, कला, संस्कृती, समाज आणि समाजाचे उन्नयन हा त्यांच्या राजकारणाचा मंत्र होता. असा मुख्यमंत्री पुन्हा लाभणार नाही, असे वंजारी म्हणाले.
गिरीश गांधी म्हणाले, यशवंतरांवामध्ये बालपणापासूनच आत्मविश्वास होता. यशवंतरावांच्या अनुयायांनीच त्यांनी दिलेल्या संस्काराचे पालन केले नाही, त्यामुळे मूल्यांची पडझड राज्यात झाली. आजही त्यांच्या विचारांनीच जाण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. आभार रमेश बोरकुटे यांनी मानले. (प्रतिनिधी)