शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शहांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला

By admin | Updated: May 28, 2015 02:14 IST

‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता’, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी करून वादळ उठवले असताना...

नागपूर : ‘विदर्भ वेगळा करण्याचा शब्द आम्ही कधी कोणाला दिला नव्हता’, असे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी करून वादळ उठवले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी हे शहा यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. शहा यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा दावा करीत वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर भाजपने माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही गडकरी यांनी बुधवारी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांचा बुधवारी वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करणार नाही, असे त्यांनी आधीच जाहीर केले होते. त्यामुळे अत्यंत साधेपणाने त्यांनी आपल्या महालातील निवासस्थानी नेते व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. या वेळी पत्रकारांनी अमित शहा यांनी विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत छेडले असता गडकरी म्हणाले, भाजपने सुरुवातीपासूनच स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेतली आहे. पक्षाच्या भूवनेश्वर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीत तसा ठरावही संमत करण्यात आला होता. तो ठराव आजही कायम आहे. त्यामुळे भाजपने या मुद्यावर माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहा यांच्या वक्तव्यामुळे विदर्भवाद्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती. भाजपविरोधी सूर आळवल्या जात होते. अशात गडकरी यांनी शहा यांच्या वक्तव्याच्या चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे ‘डॅमेज कंट्रोल’चे काम केल्याचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)मोदी, शहा ते मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छावाढदिवशी गडकरी नागपुरात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, राज्य व विदर्भातील नेत्यांनी गडकरी यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा आपल्याला भविष्यात समाजहिताची कामे करण्यासाठी बळ देतील, असे गडकरी म्हणाले. अपंगासाठी हॉस्पिटल सुरू करणारनागपूर येथे अपंगासाठी सर्वसुविधायुक्त एक हॉस्पीटल सुरू करण्याचा आपला मानस असल्याचे गडकरी यांनी सांगितले. महापालिकेने यासाठी जागा उपलब्ध करून दिली तर हे हॉस्पिटल उभारणे अधिक सोयीचे होईल, असेही ते म्हणाले. सायकल रिक्षा ओढणे हे मानवीय दृष्टीने अन्यायकारक वाटते. त्यामुळे पुढील वर्षभरात रिक्षाचालकांना स्वयंचलित रिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.